शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

विद्यार्थ्यांच्या  प्रश्नावर राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:05 IST

सकाळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मुंबई नाका येथील कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मुंबई नाका, गडकरी चौक,

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे प्रश्न : जिल्हाधिका-यांना निवेदनशाळा बंद करण्याचा निर्णय घातक

नाशिक : विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा रस्त्यावर उतरण्यात येईल असा इशाराही यावेळी मोर्चेक-यांच्या वतीने देण्यात आला.सकाळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मुंबई नाका येथील कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मुंबई नाका, गडकरी चौक, जुना त्र्यंबक नाका, मध्यवर्ती बस स्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही त्यांच्यासाठी हा निर्णय घातक आहे. त्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणे परवडणारे नाही त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. मागासवर्गीय व ओबीसी गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळालेली नसून शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची पोर्टल साईटही वारंवार बंद पडत आहे. शहरातील बस फे-या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्यास त्रास होत आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी तसेच सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी शासनाने निधी द्यावा, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी असावे, मुलींसाठी सॅनटरी नॅपकीन वेडींग मशीन बसविण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शनही केले. मोर्चात विद्यार्थी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष गोवर्धन गोवर्धने, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, संजय खैरनार, विद्यासागर घुगे, दत्ता कुटे, सागर ठाकरे, सुरज सरोवर, रमीझ पठाण, तुषार जाधव, अक्षय कहांडळ, चेतन देशमुख, यशराज गोवर्धने, श्रीपाद सुर्यवंशी, प्रतिक अहेर यांच्यासह शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक