शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आपल्या दारी, दुष्काळ उरावरी; शिर्डी येथील शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 08:07 IST

ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले. 

शिर्डी : सरकारची हाताळणी चुकते आहे. थापा मारणारे हे सरकार निर्घृण, निर्दयी व तिडवाकडं आहे. गद्दारी करून आमचे सरकार पाडले असले तरी जनतेला सामोरे जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही. सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी. अशी परिस्थिती सध्या असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत केली. शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजारांप्रमाणे तत्काळ नुकसान भरपाई द्या, वीज बिले माफ करा, अशी सरकारकडे मागणी करत ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले. 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या शेतकरी संवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राहाता, कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. यानंतर साईंचे दर्शन घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरवेळी अस्मानी नाही तर राजकारणाची सुलतानी शेतकऱ्यांना रडवतेय. मागील वर्षी अतिवृष्टीने झालेली नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. आतादुष्काळाचे पंचनामे कधी होतील व भरपाई कधी मिळेल, असा सवाल उपस्थित करतानाच एक रुपयात विमा हे थोतांड असल्याचा व विमा कंपन्यांच्या फायद्याचा व्यवहार सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

मी भारावून गेलो...आज काकडी येथे एका मुलाने शिदोरी दिली. याबाबत ठाकरे म्हणाले, शिदोरीमुळे मी भारावून गेलो. सत्ताधाऱ्यांना वाटत असेल पक्ष व वडील चोरले; पण जनता आणि आई-वडिलांचा आशीर्वाद आजही सोबत आहे. आपण ही शिदोरी खाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेshirdiशिर्डीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी