शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

सरकार आपल्या दारी, दुष्काळ उरावरी; शिर्डी येथील शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 08:07 IST

ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले. 

शिर्डी : सरकारची हाताळणी चुकते आहे. थापा मारणारे हे सरकार निर्घृण, निर्दयी व तिडवाकडं आहे. गद्दारी करून आमचे सरकार पाडले असले तरी जनतेला सामोरे जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही. सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी. अशी परिस्थिती सध्या असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत केली. शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजारांप्रमाणे तत्काळ नुकसान भरपाई द्या, वीज बिले माफ करा, अशी सरकारकडे मागणी करत ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले. 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या शेतकरी संवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राहाता, कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. यानंतर साईंचे दर्शन घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरवेळी अस्मानी नाही तर राजकारणाची सुलतानी शेतकऱ्यांना रडवतेय. मागील वर्षी अतिवृष्टीने झालेली नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. आतादुष्काळाचे पंचनामे कधी होतील व भरपाई कधी मिळेल, असा सवाल उपस्थित करतानाच एक रुपयात विमा हे थोतांड असल्याचा व विमा कंपन्यांच्या फायद्याचा व्यवहार सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

मी भारावून गेलो...आज काकडी येथे एका मुलाने शिदोरी दिली. याबाबत ठाकरे म्हणाले, शिदोरीमुळे मी भारावून गेलो. सत्ताधाऱ्यांना वाटत असेल पक्ष व वडील चोरले; पण जनता आणि आई-वडिलांचा आशीर्वाद आजही सोबत आहे. आपण ही शिदोरी खाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेshirdiशिर्डीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी