शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

इंग्रजांमुळे रुजली औपचारिक शिक्षण पद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:35 AM

भारतात कित्येक वर्षे गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी देशातील शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करून येथे औपचारिक शिक्षण पद्धतीला चालना दिली. त्यामुळेच देशात सध्याची औपचारिक शिक्षण पद्धती रुजली असून, त्यापुढील काळात कालांतराने त्यांनी भारतीयांना दिलेल्या औपचारिक शिक्षण पद्धतीमुळेच पुढे या देशात वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने रुजली, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकौतिकराव ठाले पाटील : सावानाचे वाङ्मयीन पुरस्कार प्रदान

नाशिक : भारतात कित्येक वर्षे गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी देशातील शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करून येथे औपचारिक शिक्षण पद्धतीला चालना दिली. त्यामुळेच देशात सध्याची औपचारिक शिक्षण पद्धती रुजली असून, त्यापुढील काळात कालांतराने त्यांनी भारतीयांना दिलेल्या औपचारिक शिक्षण पद्धतीमुळेच पुढे या देशात वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने रुजली, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सार्वजनिक वाचनालयाच्या १७९व्या वार्षिक समारंभाला शुक्रवारी (दि.१५) वाङ््मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याने प्रारंभ झाला.व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी, क वी किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते आदींसह पुरस्कारार्थी उपस्थित होते. ठाले पाटील पुढे म्हणाले, भारतीय इतिहासात गुरुकुलात किंवा आश्रमात पठण पद्धत होती. देशात वाचन संस्कृती ही खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळे रुजली असून, ग्रंथालये असावीत, अशी विचारधारा आगरकर, टिळक आदींनी आपल्या देशात रुजविल्याचेही ते म्हणाले.सार्वजनिक वाचनालय हे राज्यातील पहिले व देशातील दुसरे जुने वाचनालय असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.अ‍ॅड. अभिजित बगदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश नातू यांनी आभार मानले.कवी विवेक उगलमुगले, प्रा. भास्कर ढोके, डॉ. सुनील कुटे, प्रकाश वैद्य, प्रा. अनंत येवलेकर वप्राचार्य दिलीप धोंडगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांचाहीगौरव अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.सावानातर्फे लेखक रविराज गंधे यांना डॉ. वि. म. गोगटे (ललितेत्तर ग्रंथ) पुरस्काराने, तर दिनकर कुटे यांना डॉ. अ. वा. वर्टी (कथालेखन) पुरस्कार, डॉ. यशवंत पाटील यांना मु. ब. यंदे (सामाजिक, प्रवास ग्रंथ) पुरस्कार, किरण येले यांना पु. ना. पंडित (लघुकथासंग्रह) पुरस्कार, अभिजित कुलकर्णी यांना धनंजय कुलकर्णी (कादंबरी) पुरस्कार, प्रा. गो. तु. पाटील यांना अशोक देवदत्त टिळक (आत्मचरित्र ) पुरस्कार व हेरंब कुलकर्णी यांना ग. वि. अकोलकर शैक्षणिक, प्रवास ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक