शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

पूरपरिस्थितीचे नियोजन : आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:28 IST

गतवर्षी जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीचा सामना जिल्हा प्रशासनाने केला असताना यंदाही जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चारपटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा सामना जिल्हा प्रशासनाला करावा लागण्याची शक्यता आहे.  

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा आपत्ती निवारण कृती आखडा गतवर्षीप्रमाणे पूर स्थितीचा सामना करण्याचे नियोजन

 नाशिक : गतवर्षी सरासरीपेक्षा झालेला विक्रमी पाऊस आणि नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीचा सामना जिल्हा प्रशासनाने केला असताना यंदाही जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चारपटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा सामना जिल्हा प्रशासनाला करावा लागण्याची शक्यता आहे.  आपत्ती निवारण कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण कृती आराखडा तयार करावा लागतो. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून, तसा लघुकृती आराखडा तयार करून जबबदाºया निश्चित केलेल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा फटका काही प्रमाणात जिल्ह्याला बसला आणि मान्सूनपूर्व पावसापासूनच यंत्रणेच्या कामाला सुरूवात झाली आहे. नुकसानभरपाईचे पंचनामे आणि अहवाल तयार करण्यासाठी यंत्रणा कामालादेखील लागली आहे. यापुढे आणखी आपत्तीच्या प्रसंगासाठी जिल्हा प्रशासनाने जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. यात पाटबंधारे विभाग, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य यंत्रणा, महावितरण, दूरसंचार विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राज्य परिवहन महामंडळ रेल्वे व्यवस्थापक आणि वनविभागाचा कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपत्तीची सूचना मिळताच या विभागांना आपल्या कार्यक्षेत्रात करावयाच्या उपाययोजना, सूचना, प्रतिबंधात्मक उपाय, यासाठी सतर्क राहावे लागते. यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांकडे जबाबदारी निश्चित करून समन्वय आणि संपर्क यांचे सातत्य राखून जिल्हा आपत्ती कक्षाकडे माहिती पुरविण्याची महत्त्वाची भूमिका देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात मागीलवर्षी विक्रमी पाऊस झाला आणि धरणांमधून विक्रमी विसर्ग करण्यात आल्याने पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती. यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये दोन वर्षीच्या तुलनेत तीन ते पाच पट अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे दमदार पाऊस झाल्यास पूरपरिस्थिती लवकर उद्भवण्याची शक्यता आहे. गंगापूर धरण समूहात सद्यस्थितीत ३४ टक्के पाणीसाठा आहे. २०१९ मध्ये याच महिन्यात अवघा १२ टक्के इतका पाणीसाठा होता, तर जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये गतवर्षी अवघा ९ टक्के पाणीसाठा असताना यंदा हाच साठा ३१ टक्के इतका असल्याने यंदा धरणामधून लवकरच पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीNashikनाशिकfloodपूर