शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पूरपरिस्थितीचे नियोजन : आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:28 IST

गतवर्षी जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीचा सामना जिल्हा प्रशासनाने केला असताना यंदाही जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चारपटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा सामना जिल्हा प्रशासनाला करावा लागण्याची शक्यता आहे.  

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा आपत्ती निवारण कृती आखडा गतवर्षीप्रमाणे पूर स्थितीचा सामना करण्याचे नियोजन

 नाशिक : गतवर्षी सरासरीपेक्षा झालेला विक्रमी पाऊस आणि नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीचा सामना जिल्हा प्रशासनाने केला असताना यंदाही जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चारपटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा सामना जिल्हा प्रशासनाला करावा लागण्याची शक्यता आहे.  आपत्ती निवारण कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण कृती आराखडा तयार करावा लागतो. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून, तसा लघुकृती आराखडा तयार करून जबबदाºया निश्चित केलेल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा फटका काही प्रमाणात जिल्ह्याला बसला आणि मान्सूनपूर्व पावसापासूनच यंत्रणेच्या कामाला सुरूवात झाली आहे. नुकसानभरपाईचे पंचनामे आणि अहवाल तयार करण्यासाठी यंत्रणा कामालादेखील लागली आहे. यापुढे आणखी आपत्तीच्या प्रसंगासाठी जिल्हा प्रशासनाने जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. यात पाटबंधारे विभाग, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य यंत्रणा, महावितरण, दूरसंचार विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राज्य परिवहन महामंडळ रेल्वे व्यवस्थापक आणि वनविभागाचा कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपत्तीची सूचना मिळताच या विभागांना आपल्या कार्यक्षेत्रात करावयाच्या उपाययोजना, सूचना, प्रतिबंधात्मक उपाय, यासाठी सतर्क राहावे लागते. यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांकडे जबाबदारी निश्चित करून समन्वय आणि संपर्क यांचे सातत्य राखून जिल्हा आपत्ती कक्षाकडे माहिती पुरविण्याची महत्त्वाची भूमिका देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात मागीलवर्षी विक्रमी पाऊस झाला आणि धरणांमधून विक्रमी विसर्ग करण्यात आल्याने पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती. यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये दोन वर्षीच्या तुलनेत तीन ते पाच पट अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे दमदार पाऊस झाल्यास पूरपरिस्थिती लवकर उद्भवण्याची शक्यता आहे. गंगापूर धरण समूहात सद्यस्थितीत ३४ टक्के पाणीसाठा आहे. २०१९ मध्ये याच महिन्यात अवघा १२ टक्के इतका पाणीसाठा होता, तर जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये गतवर्षी अवघा ९ टक्के पाणीसाठा असताना यंदा हाच साठा ३१ टक्के इतका असल्याने यंदा धरणामधून लवकरच पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीNashikनाशिकfloodपूर