शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

पाच हजार उद्योग सुरू; पन्नास हजार कामगार कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:10 IST

सातपूर : जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मोठे उद्योग असलेले महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस यांसह जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर उद्योग सुरू झाले असून, पन्नास हजाराच्या आसपास कामगारांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. पूर्ण ताकदीने उत्पादन प्रक्रिया सुरू झाली नसली तरी हळूहळू उद्योगांची चाके गतिमान होणार आहेत.

गोकुळ सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मोठे उद्योग असलेले महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस यांसह जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर उद्योग सुरू झाले असून, पन्नास हजाराच्या आसपास कामगारांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. पूर्ण ताकदीने उत्पादन प्रक्रिया सुरू झाली नसली तरी हळूहळू उद्योगांची चाके गतिमान होणार आहेत.कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या २३ मार्चपासून ते १४ एप्रिलपर्यंत आणि दुसºया टप्प्यात ३ मेपर्यंत आणि आणि आता १७ मेपर्यंत केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. दरम्यान, २० एप्रिलपर्यंत उद्योगधंदे पूर्णपणे बंद ठेवून कामगारांना सुटी देण्यात आली होती. २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जिल्ह्यातील उद्योगांनी आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. जवळपास सहा हजारांच्या आसपास उद्योगांपैकी पाच हजारांवर उद्योगांना अटी-शर्तीनुसार रीतसर परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला परवानगी देताना कडक निर्बंध लादण्यात आले होते. कामगारांना ने-आण करण्याची जवाबदारी त्या त्या आस्थापनांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार बºयाच उद्योगांनी ही जबाबदारी पार पाडली. परंतु मोठ्या उद्योगांना ने-आण करणे शक्य नसल्याने त्यांनी परवानगी घेतली नव्हती. जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागतील. जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर उद्योग सुरू झाले असून, ५० हजारांवर कामगारांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. पूर्ण ताकदीने उत्पादन प्रक्रिया सुरू झाली नसली तरी हळूहळू उद्योगांची चाके गतिमान होणार आहेत.---४जिल्ह्यातील सातपूर, अंबड, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव, येवला, कळवण, नांदगाव, निफाड, त्र्यंबकेश्वर, वाडीवºहे, गोंदे, माळेगाव, मुसळगाव या औद्योगिक वसाहतीतील सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे असे दहा हजारांच्यावर उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये एक लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात. त्यात रोजंदारीवरील आणि कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाउनच्या काळात या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.--------४महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस, हिंदुस्थान ग्लास, ग्राफाईट इंडिया, निलय ग्रुप, एमएसएस इंडिया, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र इगतपुरी, मायलॉन, क्रॉम्प्टन ग्रीव्हज यांसह मोठ्या कारखान्यांनी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जवळपास पन्नास हजारावर कामगारांना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कामावर बोलावण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक