शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अकरावी प्रवेशासाठी अाता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:27 PM

अकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आता सोमवारपासून (दि.२७) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या चार नियमित फेऱ्यांनंतर एक विशेष फेरी पूर्ण झाली असून, आतापर्यंत सुमारे १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर झाली असून, आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेऱ्यांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्णप्रवेश प्रक्रियेच्या चार नियमित व एक विशेष फेऱ्या पूर्ण आता प्रथम येणाऱ्यास मिळणार प्रथम प्राधान्य ८० टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश

नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आता सोमवारपासून (दि.२७) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या चार नियमित फेऱ्यांनंतर एक विशेष फेरी पूर्ण झाली असून, आतापर्यंत सुमारे १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर झाली असून, आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेऱ्यांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.  महानगरपालिका क्षेत्रातील ५८ महाविद्यालयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागांपैकी आतापर्यंत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, जवळपास १३ हजार ३०० विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यात पहिल्या फेरीपासून ते पाचव्या फेरीपर्यंत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यामुळे असे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाद झाले होते. त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ निर्माण झाली होती. परंतु, शिक्षण विभागाने अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संधी उपलब्ध करून दिली असून, २७ आॅगस्टला पहिल्या टप्प्यात ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. तर २९ आॅगस्टला उपलब्ध जागांवर ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना व ३१ आॅगस्टला सर्व दहावी पास विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय