शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

By admin | Updated: September 9, 2015 22:15 IST

ओतूर : पावसाअभावी दुष्काळाचे सावट

ओतूर : पावसाळा संपत आला तरी ओतूर परिसरात जोरदार पाऊस झालेला नसल्याने ओतूर धरण कोरडे असून, परिसरातील खरीप हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे.मृग नक्षत्राच्या पावसावर मुळाणे, नरूळ, मेहदर, कन्हेरवाडी, वडाळे, कुंडाणे, शिरसमणी, भुसणी आदि भागातील शेतकऱ्यांनी अत्यंत कमी पावसावर मका, भुईमूग, उडीद, बाजरी, सोयाबीन आदि खरीप पिकांची पेरणी केली होती. रिमझिम पावसावर या पिकांना जीवदान मिळाले होते. ओतूर धरणात पाणीसाठा न झाल्याने पिकांना पाणी देता आले नाही. धरणाखालील मार्कंडेय नदीला आजही पाणी वाहत नसल्याने नदी कोरडीठाक पडली आहे. महिनाभरापासून खरीप पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांनी पिकांची अपेक्षा सोडून दिली आहे. जनावरांना चारा उपलब्ध न झाल्याने पशुपालक हवालदिल झाला आहे. पिण्याच्या पाण्याचीही स्थिती गंभीर होऊ लागली आहे. चारा, पाणीटंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी केलेली लाल कांद्याची रोपे पाण्याभावी जळून गेली आहेत. पावसाअभावी रब्बी पिकांचीदेखील अपेक्षा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाअभावी खरीप पिके जळून जात असल्याने शेतकरी शेतातील उभा मका जनावरांसाठी चारा म्हणून कापून टाकत आहेत. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे कर्ज काढून घेतली होती, तर काहींनी हातउसनवार पैसे घेतले होते. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ महादेवाची पिंडी पाण्यात बुडवून पावसाची आळवणी करीत आहेत. लोकांना अजूनही पावसाची अपेक्षा असून, परतीचा जोरदार पाऊस बरसल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काहीअंशी सुटेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)पोळा सणावर दुष्काळाचे सावट

ओतूर : परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पोेळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. आधीच वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिक पोळलेला असून, जनावरांना चारा नाही. शेतकऱ्यांच्या दारापुढे बैलजोड्या आहेत तर चारा नाही अशी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साह नाही. कुंभार समाजातही नैराश्य आहे. त्यामुळे मातीच्या बैलांवरदेखील दुष्काळाची छाया पडली आहे. मातीच्या लहान बैलजोडीची किंमत २० रुपये असून, मोठ्या मातीची बैलजोडी ५० रुपयाला आहे. त्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा यंदा मातीचे बैलही महागले आहेत. पोळा सणाला बैलजोडी सजविण्यासाठी लागणारा साजही महाग झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या शांब्या तोडे ५०० ते ६०० रुपये किलो दराने मिळत आहेत. माठोेठ्या २०० ते ३०० रुपये जोडी आहे. नाथा १०० रुपये, पैंजण ३०० रुपये जोडी दराने मिळत आहे. इतर रंगरंगोटीही कमालीची महाग झाल्याने दुष्काळी वातावरणात बैल सजवावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.