शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातून नांगर हद्दपार होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:43 IST

लखमापूर : ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्या आप आपल्या शेतामध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करीत आहे. औद्योगिक क्र ांतीचा बळीराजाने आपल्या शेतामध्ये वापर करण्यास सुरु वात केल्यामुळे शेतातील बैलनांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे.

लखमापूर : ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्या आप आपल्या शेतामध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करीत आहे. औद्योगिक क्र ांतीचा बळीराजाने आपल्या शेतामध्ये वापर करण्यास सुरु वात केल्यामुळे शेतातील बैलनांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे.आधुनिक काळात अनेक ठिकाणी बदल पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ज्या आॅफिस मध्ये 20 ते 30 कामगार काम करायचे त्याठिकाणी संगणकाने जागा घेतल्याने त्या ठिकाणी आता 4ते 5 कामगार काम करताना दिसत आहेत.आजच्या या यंञीक युगाने भरपूर ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे या युगाला यंत्रिक युग म्हणून ओळखले जाते. या युगाने आता तर असा बदल घडून आणला आहे की शेती प्रधान महाराष्ट्रातील शेतीवर आक्र मण केले आहे. पहाटेच्यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतामधील विहिरीवर मोटाच्या साह्याने शेतीला पाणी देण्याचेकाम करायचा. परंतु आता मोटा गेल्या.त्या ठिकाणी पाण्याची मोटार काम करू लागली आहे. तेव्हापासून पोळ्याला पूजन करून बैलांला मानाच्या स्थानापासून गौण स्थान मिळायला सुरु वात झाली.बळीराजा यंत्राकडे वळाल्याने कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त काम कसे होईल. याकडे भर देऊ लागला. त्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये पारंपारिक वापरल्या जाणारे जे साधने होती त्यामध्ये वखर, नांगर, पांभर, बैल नांगर इ.साधने हद्दपार करून त्या ठिकाणी ट्रॅक्टर या साधनांचा वापर करून शेतामध्ये ऐटीत चालणारा बैल हद्दपार केला आहे.-------------------------काही ठिकाणी विजेचा लंपडाव सुरू असल्याने आमचा जुन्या जमान्यातील साधनेच बरी होती. कारण वीजबील, पेट्रोल, डिझेल ची गगनचुंबी किमती यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे. महागई जर अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा शेतकरी वर्ग आपल्या परंपरागत साधनांकडे वळेल व पुन्हा एकदा शेतातील ऐटीत चालणारा बैलनांगर पाहायला मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.--------------------------------------------------ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरी वर्गाने आपल्या गोठ्यातील बैल आता न ठेवल्याने शेतातील बैल नांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे. नव्या क्र ांतीने ग्रामीण भागातील प्रत्येक ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याने ग्रामीण भागातील अनेक परंपरागत रूढी, परंपरागत साधने काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक