शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

भय इथले संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 1:04 AM

दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर झालेला मोठ्ठा आवाज, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या आणि अपघाताचे छिन्नविछिन्न अवशेष आठवले तरी काळजात अजूनही धस्स होतं.

नाशिक : दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर झालेला मोठ्ठा आवाज, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या आणि अपघाताचे छिन्नविछिन्न अवशेष आठवले तरी काळजात अजूनही धस्स होतं. एका क्षणात घडलेली घटना आणि घटनेनंतर एकेक मृतदेह स्मशानभूमीत येतांनाचे दृश्यपाहून त्या भयावह अपघाताचे भय मानातून जात नाही. अशा भावनाविवश प्रतिक्रिया आजही अपघातग्रस्त कुटुंबीयांकडून उमटत होत्या.मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ दोन आयशर टेम्पोच्या भीषण अपघातात आगरटाकळीतील राहुलनगरमधील एकाच घराण्यातील सात जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेनंतर कुटुंबीय अजूनही सावरले नाही. मयतांना अग्निडाग दिल्यानंतर जणू काही गंभीर घडलेच नाही अशा चेहऱ्याने जखमींसमोर जावे लागले. रात्री आणि दुसºया दिवशी म्हणजे सोमवारी सकाळीदेखील जखमींच्या उपचारासाठी आणि पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयातून हलविण्याचे काम सुरू होते. पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयातून काही जखमींना जिल्हा रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींना त्या भयावह घटनेतील वास्तव माहिती होऊ नये यासाठी सारेच प्रयत्न करीत आहेत.कांडेकर, डांगे, गवळी आणि लोंढे कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरून रविवारचा घातवार अजूनही जात नाही. घटनेतील तो आक्राळ चेहरा त्यांना अजूनही भयग्रस्त करून टाकतो. घटनेनंतरच्या रात्रीनंतर कुणीही शांत झोपू शकलेले नाही.रविवारचा काळा दिवस या कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण टाकळीवासीयांना अस्वस्थ करणारा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून अपघाताची चर्चा थांबलेली नाही. अपघाताच्या घटनेनंतर सारेच दु:खात असले तरी एकमेकांना आधार देण्याचे काम प्रत्येकाला करावे लागत आहे. डोळ्यातील आश्रू आटले आहेत, हुंदक्यांच्या आवाजातील गहिवर दु:खाची गहरी जाणीव निर्माण करणारा आहे. घरातील प्रत्येक लहान-मोठ्यांच्या डोळ्यात या मृत्यू तांडवाचे भय अजूनही स्पष्टपणे जाणवते.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात