शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

पालखेडला पाण्यासाठी उपोषण

By admin | Updated: March 1, 2017 00:06 IST

येवला : तालुक्यात सोडण्यात आलेले पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात पाणी कोटा मिळावा या मागणीसाठी शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत.

येवला : तालुक्यात सोडण्यात आलेले पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात चारी क्र मांक ३६ वरील पाणीवापर संस्था व शेतकरी यांना पाण्याच्या हक्काचा निर्धारित पाणी कोटा मिळावा या मागणीसाठी या क्षेत्रातील १४ पाणीवापर संस्थांचे अध्यक्ष आणि शेतकरी मंगळवारी येथील पालखेड उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.  चिचोंडी, बदापूर, पारेगाव, निमगावमढ, नाटेगाव,अंगणगाव, बाभूळगाव या ठिकाणच्या विविध १४ पाणीवापर संस्थांना १० जानेवारीच्या पहिल्या आवर्तनात ६० टक्के पाणी आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या आवर्तनात ४० टक्के पाणी देण्याचे पाटबंधारे खात्याचे नियोजन होते. पाणी वापर संस्थांचे चेअरमन भाऊसाहेब कांबरे, श्याम मढवई, ज्ञानेश्वर मढवई, प्रमोद लभडे, बबन मढवई, चंद्रकांत मोरे, यतिन पटेल, किसन मढवई, दिगंबर आव्हाड, विठ्ठल आठशेरे, जनार्दन खिल्लारे, सूर्यकांत दिवटे, अण्णा कोटकर, बद्रीनाथ मढवई यांच्यासह शेतकऱ्यांनी पालखेड मुख्य अभियंता यांना सह्यांचे निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले होते. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. चारी नंबर ३६ या भागात चारी ओलीदेखील झाली नाही. अशातच पाणी बंद केले. पाणी सोडल्यानंतर पालखेड विभागाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे सदर हक्काचे पाणी तत्काळ मिळावे, अशी जोरदार मागणी उपोषणास बसलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर) पहिल्या आवर्तनात चिचोंडी परिसरातील या १४ पाणीवापर संस्थांना केवळ ४० ते ४५ टक्के पाणी कोटा मिळाला. आता दुसरे पाणी आवर्तन सुरू होऊन १० ते १२ दिवस झाले. टेलकडून वितरकांना पाणी देण्यात आले. ३६ चारीवरील शेतकऱ्यांना ४० टक्के पाणी कोटा देण्याचे नियोजन असताना अभियंता आणि कर्मचारी यांनी कोटा शिल्लक नसल्याचे कारण सांगत केवळ दोन दिवसात चारी केवळ ओली करीत पाणी बंद केले.   या परिसरातील २,९३६ हेक्टर क्षेत्रावरील पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. पाणी आवर्तनाच्या आमच्या हक्काचे ४० टक्के पाणी द्यावे, अशी मागणी यापूर्वीच पालखेड अभियंता यांना या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. परंतु पाणी बंद झाल्याने शेतकरी हैराण झाले. आणि त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. शिवसेना नेते संभाजी पवार, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, कालवा सल्लागार समिती सदस्य सुरेश कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी केली. पालखेड अधिकारी कोणीही उपोषणस्थळी फिरकले नाहीत. शासनाची अकार्यक्षमता अधिकाऱ्यांची उदासीनता, नियोजनाचा अभाव, पाणी वितरण व्यवस्थेत असलेला अपुरा कर्मचारी वर्ग याबाबत तीव्र नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.