शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञांचा सूर : मानव-बिबट संघर्षावर पिंजऱ्याद्वारे मात अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 17:45 IST

जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते

ठळक मुद्देबिबट्याच्या जीवशास्त्राबाबत जनजागृती होणे काळाची गरज बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे

नाशिक : बिबट्या भयंकर अशा मनुष्यप्राण्यासोबत जगण्यास शिकला; मात्र मनुष्यप्राणी त्याच्यासोबत जगणे शिकलेला नाही. पिंजरे लावून बिबट्या आणि मानवामधील संघर्ष सुटणार नाही, तर तो अधिक वाढत जाणार आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राबाबत जनजागृती होणे काळाची गरज आहे, असा सूर परिसंवादातून उमटला.वनविभाग पुर्व-पश्चिम विभागाच्या वतीने आयोजित ‘मानव-बिबट्या यांच्यातील परस्पर संबंध’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. उंटवाडी रस्त्यावरील वन निरिक्षण कुटीमधील सभागृहात झालेल्या या परिसंवादात वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ निकीत सुर्वे, पत्रकार रंंजीत जाधव यांनी प्रामुख्याने भाग घेतला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपवनसंरक्षक टी. ब्यूला एलील मती, डॉ. शिवाबाला एस., सहायक वनसंरक्षक राजन गायकवाड, राजेंद्र कापसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, सुनील वाडेकर, संजय भंडारी यांसह शहरातील विविध वन्यजीव अभ्यासक, पत्रकार, वनरक्षक उपस्थित होते. जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुर्वे म्हणाले, बिबट्या या वन्यप्राण्याचा खरा तर जगण्याशी संघर्ष सुरू आहे. नैसर्गिक अधिवास काळानुरूप संपल्याने बिबट्या अनेकदा मानवी वसाहतीजवळही दिसून येतो. भूक भागविण्यासाठी बिबट्याची शेकडो किलोमीटरची भटकंती होत आहे. मानवी वस्तीजवळ असलेल्या आधिवासाशी जुळून घेत बिबट्या जवळपास राहण्यास पटाईत आहे. मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजºयाचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो; मात्र मानवी वस्तीजवळ असलेल्या थोड्याफार जंगलच्या भागातही पिंजरे लावण्याची मागणी जेव्हा होते तेव्हा अशी मागणी मानव-बिबट संघर्ष अधिक वाढविणारी असते. कारण पिंज-यात एक बिबट्या जेरबंद जरी झाला तरी त्याचा कॉरिडोरचा ताबा दुसरा बिबट्या घेत असतो, हे संशोधनातून पुढे आले आहे, असे सुर्वे म्हणाले.प्रसारमाध्यमांनी अधिक जबाबदारीबिबट-मानव संघर्ष रोखण्यासाठी प्रसारमाध्यमांनी जबाबदारी ओळखणे तितकेच गरजेचे आहे. कारण प्रसारमाध्यामातून बिबट्याविषयी येणारे वृत्त हे अत्यंत भडक व अतिरंजीत स्वरुपात असतात. त्यामुळे जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी अधिक नकारात्मक भावना निर्माण होत असते. बिबट्याचा मुळ आधिवास नष्ट होणे व नागरी वस्तीत त्याचा शिरकाव यामागील कारणे शोधून बिबट्याबाबत बातम्या प्रसारमाध्यमांनी देण्याची गरज आहे, असे रंजीतजाधव म्हणाले.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकforestजंगलwildlifeवन्यजीव