शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तज्ज्ञांचा सूर : मानव-बिबट संघर्षावर पिंजऱ्याद्वारे मात अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 17:45 IST

जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते

ठळक मुद्देबिबट्याच्या जीवशास्त्राबाबत जनजागृती होणे काळाची गरज बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे

नाशिक : बिबट्या भयंकर अशा मनुष्यप्राण्यासोबत जगण्यास शिकला; मात्र मनुष्यप्राणी त्याच्यासोबत जगणे शिकलेला नाही. पिंजरे लावून बिबट्या आणि मानवामधील संघर्ष सुटणार नाही, तर तो अधिक वाढत जाणार आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राबाबत जनजागृती होणे काळाची गरज आहे, असा सूर परिसंवादातून उमटला.वनविभाग पुर्व-पश्चिम विभागाच्या वतीने आयोजित ‘मानव-बिबट्या यांच्यातील परस्पर संबंध’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. उंटवाडी रस्त्यावरील वन निरिक्षण कुटीमधील सभागृहात झालेल्या या परिसंवादात वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ निकीत सुर्वे, पत्रकार रंंजीत जाधव यांनी प्रामुख्याने भाग घेतला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपवनसंरक्षक टी. ब्यूला एलील मती, डॉ. शिवाबाला एस., सहायक वनसंरक्षक राजन गायकवाड, राजेंद्र कापसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, सुनील वाडेकर, संजय भंडारी यांसह शहरातील विविध वन्यजीव अभ्यासक, पत्रकार, वनरक्षक उपस्थित होते. जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुर्वे म्हणाले, बिबट्या या वन्यप्राण्याचा खरा तर जगण्याशी संघर्ष सुरू आहे. नैसर्गिक अधिवास काळानुरूप संपल्याने बिबट्या अनेकदा मानवी वसाहतीजवळही दिसून येतो. भूक भागविण्यासाठी बिबट्याची शेकडो किलोमीटरची भटकंती होत आहे. मानवी वस्तीजवळ असलेल्या आधिवासाशी जुळून घेत बिबट्या जवळपास राहण्यास पटाईत आहे. मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजºयाचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो; मात्र मानवी वस्तीजवळ असलेल्या थोड्याफार जंगलच्या भागातही पिंजरे लावण्याची मागणी जेव्हा होते तेव्हा अशी मागणी मानव-बिबट संघर्ष अधिक वाढविणारी असते. कारण पिंज-यात एक बिबट्या जेरबंद जरी झाला तरी त्याचा कॉरिडोरचा ताबा दुसरा बिबट्या घेत असतो, हे संशोधनातून पुढे आले आहे, असे सुर्वे म्हणाले.प्रसारमाध्यमांनी अधिक जबाबदारीबिबट-मानव संघर्ष रोखण्यासाठी प्रसारमाध्यमांनी जबाबदारी ओळखणे तितकेच गरजेचे आहे. कारण प्रसारमाध्यामातून बिबट्याविषयी येणारे वृत्त हे अत्यंत भडक व अतिरंजीत स्वरुपात असतात. त्यामुळे जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी अधिक नकारात्मक भावना निर्माण होत असते. बिबट्याचा मुळ आधिवास नष्ट होणे व नागरी वस्तीत त्याचा शिरकाव यामागील कारणे शोधून बिबट्याबाबत बातम्या प्रसारमाध्यमांनी देण्याची गरज आहे, असे रंजीतजाधव म्हणाले.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकforestजंगलwildlifeवन्यजीव