शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ब्रह्मगिरीला परिसंवेदनशील घोषित करण्यासाठी तज्ज्ञांची रसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 1:48 AM

ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन तज्ज्ञ जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

ठळक मुद्देराजेंद्रसिंह यांच्याकडून मदत : सर्वेक्षणाचे काम सुरू

नाशिक : ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन तज्ज्ञ जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

नदी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. नीलेश हेडा तर वने क्षेत्रातील तज्ज्ञ मोहनभाई हिराभाई ही या दोन तज्ज्ञांची नावे असून ते जिल्हाधिकाऱ्यांना सक्रिय मदत करतील, असे राजेंद्रसिंह यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेत ब्रह्मगिरीची जैव विविधता आणि धार्मिक महत्त्व यांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे ती अधिक महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.

नाशिकच नव्हे तर सात राज्यांत गोदावरी नदीचा संबंध येतो. त्यामुळे गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीच्या ठिकाणी बेकायदा उत्खनन सुरू करण्यात आल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्याविरुद्ध नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर या लढ्यात राजेंद्रसिंहदेखील सहभागी झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी सात राज्यांतील पर्यावरणप्रेमीही या लढ्यात सहभागी करून घेतले होते. नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर राजेंद्रसिंह यांनी बुधवारी (दि. २८) जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ब्रह्मगिरी पर्वत परिसंवेदनशील घोषित करण्यात येईल, असे सांगितले आणि त्यानुसार सायंकाळीच अधिसूचनादेखील जारी केली आणि गुरुवारी (दि. २९) त्याचे कामदेखील सुरू केले आहे, तसे जिल्हाधिकाऱ्यांनी राजेंद्रसिंह यांना कळवले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर