शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवस उपचारानंतरही ५५ टक्के रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:15 IST

नाशिक: नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होण्यासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याची ...

नाशिक: नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होण्यासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती असताना प्रत्यक्षात मात्र खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये चार दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार घेऊन बाधित रुग्ण दगावण्याचे प्रमाण ५५ टक्के असल्याची धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. विशेष म्हणजे बाधित रुग्ण घरात असतांना होणाऱ्या मृत्यूपेक्षा रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जवळपास ९७ टक्के इतके आहे.

नाशिक जिल्ह्यात सुमारे ३३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनाने बाधित असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांच्या संख्येत दररोज सुमारे तीन ते चार हजारांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत. अनेकांना रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत म्हणून परत पाठविले जात आहे तर काही ठिकाणी खाटा असल्या तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर नसल्याचे कारण देत रुग्णांना नाकारण्यात येत आहे. जे रुग्ण दाखल आहेत, त्यांना वाचविण्यासाठी डॉक्टर, रुग्णांचे नातेवाईक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. प्रसंगी रेमडेसिविर, टोसी सारख्या इंजेक्शनसाठी धावपळ करून काळाबाजारात जादा दराने खरेदी करीत आहेत. साधारणत: दहा ते बारा दिवसात रुग्ण बरे होऊन घरी सोडले जात असले तरी, आजवर झालेेल्या ३६९२ मृत्यूंची आरोग्य विभागाने कारणमीमांसा केली असता, त्यात चार दिवसांपेक्षा अधिक दिवस रुग्णालयात उपचार घेऊनदेखील २०३० रुग्णांचा मृत्यू झाल्याचा म्हणजेच एकूण ५४.९८ टक्के मृत्यूचा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरी भागाइतक्याच प्रमाणात काेरोना बाधित रुग्ण दगावले असून, संशयित रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. परंतु काही रुग्णांना लक्षणे असूनही त्यांनी दुर्लक्ष करून घरच्या घरीच उपचार करण्यावर भर दिला. अशा घरातच राहून उपचार करणाऱ्या सुमारे ११५ रुग्णांचा घरीच मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण ३ टक्के इतके आहे. एक ते सलग तीन दिवस रुग्णालयात उपचार घेऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. रुग्णालयात उपचार होतांना मृत्यू होण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी, रुग्णांची प्रकृती गंभीर असणे व उपचाराला प्रतिसाद न देणे ही त्यामागची कारणे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

--------

उपचाराचे दिवस व मृत्यूचे प्रमाण

१) घरी मृत्यू पावलेले- ११५ (३.११)

२) एक दिवस उपचार - ७४८ (२०.२६)

३) दोन दिवस उपचार- ४३४ (११.७६)

४) तीन दिवस उपचार - ३६५ (९.८९)

५) चार दिवसानंतर उपचार - २०३० (५४.९८)