शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला स्मार्ट बनविण्याचा खटाटोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 01:02 IST

कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी नाशकात दोन वर्षे मुदतवाढीचे संकेत दिले. नेमके काय घडणार, हे कळायला मार्ग नाही. पण यानिमित्ताने साडेचार वर्षांत काय झाले, याचा लेखाजोखा नाशिककरांसमोर आला.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी कंपनीने कोट्यवधींच्या घोषणा केल्या.स्वायत्ततेला गालबोट पाच वर्षे ही कामे सुरू असताना त्यावर वचक ठेवण्याचे काम का झाले नाही,

बेरीज वजाबाकीमिलिंद कुलकर्णीमुंबई-पुण्याच्या तुलनेत अजूनही वेगाने होणारे शहरीकरण आणि त्यापाठोपाठ येणारे बकालीकरण यापासून नाशिक वाचले आहे. महापालिका देत असलेल्या सुविधांवर नागरिक समाधानी आहेत; परंतु राजकीय पक्ष प्रत्येक निवडणुकीआधी मोठमोठी स्वप्ने दाखवतात, नाशिककर त्याला भुलतात. भरभरून मते देतात आणि पाच वर्षांतील त्यांची कामगिरी पाहून पुढच्या वेळी त्यांना सत्तेवरून खेचतात, हा वर्षानुवर्षांपासून चाललेला क्रम आहे. महापालिकेत सत्ता कोणत्याही पक्षाची असो; पण सत्तेतील भागीदार मोजकी २५ कुटुंबे आहेत. पक्ष बदलतील, कधी स्वत: तर कधी कुटुंबीय, तर कधी सहकुटुंब महापालिकेत जातील. जनसेवेची ही तळमळ विलक्षण म्हणावी लागेल. भाजपच्या हाती सत्ता येताच नाशिककरांना स्मार्ट बनविण्याचा विडा उचलण्यात आला. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकासाची बुलेट ट्रेन धावेल, अशा घोषणा झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शहर दत्तक घेतले. आता विकासाची पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही, असे वाटू लागले. स्मार्ट सिटी कंपनीने कोट्यवधींच्या घोषणा केल्या. नाशिकमधील ५४ प्रकल्पांचा आराखडा तयार करून ४३८६ कोटी रुपयांचा निधी केंद्र, राज्य सरकार व महापालिकेच्या तिजोरीतून खर्च होणार असल्याचे निश्चित झाले. दीड वर्षापूर्वी राज्यात सत्तापरिवर्तन झाले. साडेतीन वर्षांत आश्वासनपूर्ती न करणाऱ्या भाजपला निमित्त मिळाले. स्मार्ट सिटीच्या कामांची मुदत मार्च २०२१ मध्ये संपत आहे. या योजनेचे राज्याचे प्रमुख कुणालकुमार यांनी मुदतवाढ मिळणार नाही असे औरंगाबादला म्हटले, तर कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी नाशकात दोन वर्षे मुदतवाढीचे संकेत दिले. नेमके काय घडणार, हे कळायला मार्ग नाही. पण यानिमित्ताने साडेचार वर्षांत काय झाले, याचा लेखाजोखा नाशिककरांसमोर आला. ११५२ कोटी रुपयांपैकी ४३ कोटी रुपयांचे सात प्रकल्प पूर्ण झाले. त्यात विद्युत शवदाहिनी, महात्मा फुले कलादालन, कालिदास कलामंदिर, नेहरू उद्यान सुशोभीकरण, गोदावरीतील पाणवेली काढणे, स्मार्ट रस्ता या कामांचा समावेश आहे. पीपीपी अंतर्गत कामांसाठी ४८१ कोटींची तरतूद होती, मात्र २९ कोटी रुपये खर्च झाले. त्यात पब्लिक बायसिकल केअरिंग, घनकचरा व्यवस्थापन यांचा समावेश आहे.स्वायत्ततेला गालबोटकेंद्र व राज्य सरकारच्या योजना, पॅकेज या बाबी स्थानिक स्वराज्य संस्थांना सहाय्यभूत असायला हव्यात. आपल्या शहराच्या प्राधान्यक्रमाच्या योजना काय आहेत, याचा निर्णय त्या संस्थांनी घेण्याचे स्वातंत्र्य हवे. मात्र पूर्वीच्या नगरोत्थान असो की, आताची स्मार्ट सिटी योजना, यात सरकार प्रकल्प थोपवत आहे. गरजेच्या गोष्टींऐवजी अनावश्यक गोष्टींवर भर दिला जातो. यामुळे त्या शहराचे नुकसान होते. नगरसेवक व अधिकाऱ्यांना हितसंबंधाचे राजकारण व अर्थकारणामुळे कोणता प्रकल्प, कोणतीही योजना आली तरी फार काही देणे-घेणे असत नाही. परंतु, शहराच्या मूलभूत गोष्टींवर होणारा परिणाम हा दूरगामी असतो. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, गटारे, कचरा व्यवस्थापन, रस्ते आणि वाहतूक या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असते. या गोष्टी चांगल्या असतील तर शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सुविधा उत्तम होण्यासाठी प्रयत्न केले जातात. नाशिकला त्या मानाने या सुविधा चांगल्या आहेत. त्यात सुधारणा, वाढ करण्याची आवश्यकता आहे. स्मार्ट सिटी योजनेतून अशा कामांना प्राधान्य देण्याची आवश्यकता होती; परंतु महापालिका आणि सरकार या दोन्ही पातळीवर नागरी विकास या विषयावर वेगळा विचार करण्याबाबत उदासीनता आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांविषयी तक्रारी करणे, आरोप-प्रत्यारोप करणे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या उचलबांगडीसाठी जोर लावणे अशा बाबींमधून साध्य काय होत आहे, याचा गांभीर्याने विचार करायला हवा. पाच वर्षे ही कामे सुरू असताना त्यावर वचक ठेवण्याचे काम का झाले नाही, कंपनीच्या संचालकांनी त्यांची जबाबदारी निभावली काय, असे प्रश्न यातून निर्माण होत आहेत. शहर बससेवा पुढील आठवड्यात सुरू होत आहे. पूर्वी एस. टी. महामंडळ ही सेवा देत होती. तक्रारी असतील, अडचणी असतील; पण अनुभव असलेले एक महामंडळ ही सेवा देत होती. आता खासगी कंत्राटदाराच्या हाती सेवा दिली गेली आहे. त्याच्यावर वचक राहील, हे तरी बघायला हवे, अन्यथा "तेलही गेले, तूपही गेले" असे होईल. 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका