शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

येवल्यात दुष्काळाच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:42 AM

दुष्काळाचे दृष्टचक्र येवलेकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर ,सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत आपला दिवस पुढे ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पाटोदा : दुष्काळाचे दृष्टचक्र येवलेकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर ,सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत आपला दिवस पुढे ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.खरीप व रब्बी हंगाम वाया गेल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. पाऊस न पडल्यामुळे नदी, नाले, साठवण बंधारे यांच्यात थेंबभर पाणीही साचले नाही. विहिरी, कूपनलिका कोरड्यापडल्या तर बोअरवेल, हातपंप, कूपनलिकांनी केव्हाच माना टाकल्यामुळे सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याच्या प्रश्नानेही उग्र रूप धारण केले आहे. पशुपालकांना जनावरे जागविण्याचा मोठा प्रश्न पडला आहे. अत्यल्प कामांमुळे शेती ओस पडल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांच्या हाताना काम नसल्याने रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात तर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील सर्वच स्रोत कोरडे ठणठणीत आहे. पन्नासच्या वर गावे व तीस वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. या गावातील नागरिकांना अत्यल्प पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. शासनाने येवला तालुक्यातील काही गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली आहेत. मात्र अद्याप या गावांना दुष्काळाच्या कोणत्याही सोयी सुविधा अथवा दुष्काळी कामे सुरू न केल्यामुळे या भागातील नागरिकांना व मजुरांना काम नसल्यामुळे हे मजूर रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यात तसेच राज्यात जात असल्याने गावे ओस पडू लागली आहेत. मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी मजुरांच्या हातांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.दुष्काळाशी झगडत जगण्याची बेरीज मांडताना अस्मानी-सुलतानी संकटाची मालिका शेतकऱ्यांसह मजुरांची जगण्याची लढाई अपयशी ठरत आहे. शासनाने या भागात चारा छावण्या सुरू कराव्यात अथवा चारा उपलब्ध करून दिल्यास शेतकºयांना दिलासा मिळेल.यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही तालुक्यातील काही भागातील शेतकºयांनी प्रतिकूल हवामानाचा फायदा उठवत शेतात नगदी पीक म्हणून कांदा उत्पादन घेतले त्यासाठी मोठा खर्च केला; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. कांदा विकून आलेल्या पैशात केलेला खर्चही वसूल झाला नाही. द्राक्ष व इतर शेतमालाचीही तीच अवस्था झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी