शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत दोघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: September 4, 2016 01:24 IST

चामरलेणी येथील घटना : चौघे बचावले; कलानगरमधील रहिवाशांवर दु:खाची छाया

पंचवटी : मित्रांसमवेत चामारलेणीजवळील छोट्या पाण्याच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहापैकी दोघा मित्रांंचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना काल शुक्रवारी (दि.२) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. पाण्यात बुडून मृत्यू झालेले दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी असून, ते दिंडोरी रोडवरील कलानगर येथील रहिवासी आहेत. परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अथर्व बिहान्त कुलकर्णी (१८) व रोहित कोलते (दोघे राहणार आकाश पेट्रोलपंपासमोर) असे मयत झालेल्यांची नावे आहेत. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, म्हसरूळ परिसरातील कलानगर भागात राहणारे अथर्व बिहान्त कुलकर्णी (१८), रोहित कोलते (१६), सागर राजू निकम (१७), अभिनय संजय सावंत (१६), ओम संजय पाटील (१६), ओमकार बिहान्त कुलकर्णी (१६) असे सहा मित्र काल सायंकाळच्या सुमाराला म्हसरूळ चामारलेणीजवळील पाण्याच्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. अभिनय वगळता पाच जणांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र पाण्याचा व चिखलाचा अंदाज न आल्याने सर्वजण गटांगळ्या खाऊन पाण्यात बुडू लागले. त्यात सागर निकम, अभिनय सावंत, ओमकार कुलकर्णी हे कसेबसे पाण्याच्या बाहेर निघाले तर अथर्व कुलकर्णी व रोहित कोलते हे पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा पाण्यात उड्या घेत अर्धा तास शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडत नसल्याचे परिसरात फिरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना सांगितले. त्यानंतर काहींनी पोलिसांना व भाजपाच्या विजय मोहिते यांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पंचवटी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी पाण्यात उड्या मारून यातील एकाला मृतावस्थेत पाण्याबाहेर काढले. या घटनेतील मयत अथर्व हा क.का. वाघ महाविद्यालयात १२वी विज्ञान शाखेच्या वर्गातील विद्यार्थी असून, त्याच्या पश्चात फक्त आई आहे, तर रोहित हा महावीर कॉलेजला डिप्लोमा करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शोककळा पसरली असून, दोघांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)