शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

नाटक हे सामाजिक माध्यम: प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:04 IST

मराठी नाटक जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल किंवा पूर्वी झाले असेल तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याचा हेतू असा की, मराठी माणसं तेव्हा काय करीत होती? त्या-त्या काळातले सामाजिक आणि सांस्कृतिक आयाम काय होते, हे समजण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे रंगभूमीकडे केवळ मनोरंजन अशा संकुचित दृष्टीने बघणे आधी थांबविले पाहिजे, असे प्रतिपादन ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले आहे.

ठळक मुद्दे सावानाच्या ग्रंथालय सप्ताहाचा शुभारंभ

नाशिक : मराठी नाटक जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल किंवा पूर्वी झाले असेल तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याचा हेतू असा की, मराठी माणसं तेव्हा काय करीत होती? त्या-त्या काळातले सामाजिक आणि सांस्कृतिक आयाम काय होते, हे समजण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे रंगभूमीकडे केवळ मनोरंजन अशा संकुचित दृष्टीने बघणे आधी थांबविले पाहिजे, असे प्रतिपादन ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले आहे.सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात शुक्रवारी (दि.१४) ग्रंथालय सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी मराठी रंगभूमी स्थिती-गती विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्यासह प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, ग्रंथ सचिव बी. जी. वाघ, नाटककार दत्ता पाटील, कार्याध्यक्ष धर्माजी बोडके उपस्थित होते. प्रेमानंद गज्वी म्हणाले, नाटक हे फार गंभीर माध्यम आहे. रंगभूमीचा हेतू आहे जो प्रामुख्याने प्रबोधन आहे, हे विसरून चालणार नाही.आपण मराठी नाटकाची परंपरा सांगतांना विष्णुदास भावेंपासून सांगतो. खरंतर त्यांच्या आधीही कर्नाटकामध्ये मराठी रंगभूमी होती. त्याचाही उल्लेख आपण केला पाहिजे. रंगभूमीबद्दल आपण फार विचार करत नाही, असा गंभीर विचार करून गंभीरपणे नाटक लिहिणारी नाटककार मंडळी शोधावी लागतील. जे नवीन प्रश्न निर्माण झालेत, त्यावर नाटकाच्या माध्यमातून आज भाष्य करणारे कोण डोळ्यासमोर येतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.दरम्यान, ९९व्या अखिल मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सावनातर्फे नाटककार दत्ता पाटील यांच्या हस्ते प्रेमानंद गज्वी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले, तर सूत्रसंचालन शंकर बोºहाडे यांनी केले.सध्याचे नाटक पुरेसे गंभीर नसल्याची खंतसध्याच्या स्थितीत होणाऱ्या उलथापालथींवर कुणी नाट्यभाषेतून व्यक्त झालेय का? असा प्रश्न उपस्थित करतानाच व्यावसायिक रंगभूमीला पर्याय म्हणून अगदी विजय तेंडुलकरांच्या काळापर्यंत प्रायोगिक रंगभूमीचा पर्याय म्हणून विचारही केला गेलेला नाही, काही ठोस उभेही केले गेले नाही. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमी आपोआप व्यावसायिक रंगभूमीत विलीन होत गेली. या दृष्टीने विचार करणारे लोक आपल्याकडे नाहीत असे नाही, पण पुरेसे गंभीर नाहीत त्यामुळे सध्याचे नाटकही पुरेसे गंभीर नसल्याची खंत प्रेमानंद गज्वी यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक