शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा दुहेरी फटका

By admin | Updated: January 3, 2017 22:54 IST

द्याने परिसरातील शेतकरी हवालदिल

द्याने : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे द्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, ५० दिवसांनंतरही व्यापाऱ्यांकडे चलन तुटवडा असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.  शेतकऱ्यांनी मका व कांदा विक्र ी केल्यानंतर तब्बल १५ दिवसात धनादेश मिळत असून, धनादेश जमा होण्यास अजून १५ दिवस शेतकऱ्यांना वाट पहावी लागत आहे. मजुरांना मजुरी देण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे पूर्वी चालत असलेली ‘पडजी’ पद्धतीने व्यवहार सुरू असल्याचे चित्र मोसम परिसरात पाहावयास मिळत आहे. नामपूर आठवडे बाजारात भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली असून भाजीपाला तर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे.  केंद्रसरकारने 8 नोव्हेंबरपासून एक हजार व पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्या.हा निर्णय चांगला असला तरी 50 दिवस उलटूनही सरकार नवीन चलन उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरल्याने व्यवहारात चलनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे शेतीचे अनेक व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.बाजारात शेतीमाल विक्र ीनंतर तब्बल एक मिहना पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कांदा गहू,हरभरा ही पिके जोमात आहेत त्यांच्याकरिता खतांची मात्रा,बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरु आहे.शेतीची कामे वाढल्यामुळे शेतमजुरांची गरज भेडसावत आहे.मात्र आवश्यक पैसे मिळणे दुरापास्त झाले आहे.
बँकांमध्ये शेतकरी, पेन्शनर, महिला, अपंग, वृद्ध यांना रांगेत उभे राहून मिळताय कमी पैसे मिळत असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकरीवर्गाची मोठ्या प्रमाणावर खाती असून, पुरेसा चलन पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर थांबावे लागते.
नोटबंदीमुळे बँकातून रक्कम काढण्यावर घातलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना पैसे काढण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागत असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिवसभर उभे राहून दोनच हजार हातात मिळत असून, त्यामुळे पैसे काढण्यासाठी वारंवार जावे लागत असल्याने शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना बँकेत रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांना मालविक्र ीनंतर पैसे रोख मिळत नसल्यामुळे सध्या कांदा, मका, हरभरा, गहू आदि पिकांना खते, बियाणे, औषधे, मजुरांचे पैसे देणे असो की दैनंदिन गरजांसाठी पुरेसा पैसा बँकांकडून मिळत नसल्याने सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असून, द्यानेसह मोसम परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू आहे. शेतीची मशागत, खते, लागवडीसाठी मजुरांना देण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कांदा मातीमोल भावाने विकावा लागत असल्याने व विकलेल्या मालाचे धनादेश मिळत असल्याने दुहेरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर)