शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

कुणावरही नाही तुमच्या अनुभवावर विश्वास ठेवा : जगन्नाथ दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 01:34 IST

मधुमेह रुग्णांना ज्यावेळी मधुमेह असल्याचे कळते तेव्हा त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, असे सांगितले जाते. यामुळे ते निराश झालेले असतात. यासाठी ते काहीही करायला तयार असतात, पण कोणतीही गोष्ट मनाने करू नका. त्यासाठी सल्ला घ्या. कुणावरही विश्वास ठेवू नका तुमच्या अनुभवावरच विश्वास ठेवा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.

ठळक मुद्दे‘जीवनशैली बदलातून मधुमेहावर मात’ विषयावर व्याख्यान

नाशिक : मधुमेह रुग्णांना ज्यावेळी मधुमेह असल्याचे कळते तेव्हा त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, असे सांगितले जाते. यामुळे ते निराश झालेले असतात. यासाठी ते काहीही करायला तयार असतात, पण कोणतीही गोष्ट मनाने करू नका. त्यासाठी सल्ला घ्या. कुणावरही विश्वास ठेवू नका तुमच्या अनुभवावरच विश्वास ठेवा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. येथील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि.२९) आयोजित ‘जीवनशैली बदलातून स्थूलत्व व मधुमेहमुक्ती’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. दीक्षित म्हणाले, माणूस सर्वाधिक वर्ष जंगलात राहिलेला आहे. यामुळे तसे पाहिले तर त्याला उपाशी राहण्याची सवय आहे. माणसाच्या पेशी उपाशी राहण्यासाठी तयार झालेल्या आहेत. भरपेट खाण्यासाठी नाही. जो तीनदा खातो तो रोगी हे जेव्हा माणसाला कळू लागले तेव्हा तो वेगळ्या जीवनशैलीकडे वळाला. यावेळी त्यांनी जीवनशैली आणि डाएट प्लान यांमधील फरक समजावून सांगितला. डाएट प्लान यशस्वी होण्यासाठी पैसा लागतो, तर जीवनशैली फुकटात यशस्वी होते. यासाठी तुम्हाला जे खायचे ते खा, पण भुकेच्या वेळेला खा. हे जर केले तर तुमच्या ८० टक्के समस्या तेथेच कमी होतात. कोणतीही गोष्ट लगेचच होत नाही, तर त्याला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. यामुळे किमान तीन महिने प्रयाेग करावा, असेही ते म्हणाले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी काही लाभार्थ्यांनी डॉ. दीक्षित यांच्या पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आलेल्या अनुभवांचे कथन केले. डाॅ. दीक्षित यांच्या संस्थेच्यावतीने आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि संस्थेला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील नागरिक माठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य