शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

कुणावरही नाही तुमच्या अनुभवावर विश्वास ठेवा : जगन्नाथ दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 01:34 IST

मधुमेह रुग्णांना ज्यावेळी मधुमेह असल्याचे कळते तेव्हा त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, असे सांगितले जाते. यामुळे ते निराश झालेले असतात. यासाठी ते काहीही करायला तयार असतात, पण कोणतीही गोष्ट मनाने करू नका. त्यासाठी सल्ला घ्या. कुणावरही विश्वास ठेवू नका तुमच्या अनुभवावरच विश्वास ठेवा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.

ठळक मुद्दे‘जीवनशैली बदलातून मधुमेहावर मात’ विषयावर व्याख्यान

नाशिक : मधुमेह रुग्णांना ज्यावेळी मधुमेह असल्याचे कळते तेव्हा त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, असे सांगितले जाते. यामुळे ते निराश झालेले असतात. यासाठी ते काहीही करायला तयार असतात, पण कोणतीही गोष्ट मनाने करू नका. त्यासाठी सल्ला घ्या. कुणावरही विश्वास ठेवू नका तुमच्या अनुभवावरच विश्वास ठेवा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. येथील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि.२९) आयोजित ‘जीवनशैली बदलातून स्थूलत्व व मधुमेहमुक्ती’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. दीक्षित म्हणाले, माणूस सर्वाधिक वर्ष जंगलात राहिलेला आहे. यामुळे तसे पाहिले तर त्याला उपाशी राहण्याची सवय आहे. माणसाच्या पेशी उपाशी राहण्यासाठी तयार झालेल्या आहेत. भरपेट खाण्यासाठी नाही. जो तीनदा खातो तो रोगी हे जेव्हा माणसाला कळू लागले तेव्हा तो वेगळ्या जीवनशैलीकडे वळाला. यावेळी त्यांनी जीवनशैली आणि डाएट प्लान यांमधील फरक समजावून सांगितला. डाएट प्लान यशस्वी होण्यासाठी पैसा लागतो, तर जीवनशैली फुकटात यशस्वी होते. यासाठी तुम्हाला जे खायचे ते खा, पण भुकेच्या वेळेला खा. हे जर केले तर तुमच्या ८० टक्के समस्या तेथेच कमी होतात. कोणतीही गोष्ट लगेचच होत नाही, तर त्याला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. यामुळे किमान तीन महिने प्रयाेग करावा, असेही ते म्हणाले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी काही लाभार्थ्यांनी डॉ. दीक्षित यांच्या पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आलेल्या अनुभवांचे कथन केले. डाॅ. दीक्षित यांच्या संस्थेच्यावतीने आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि संस्थेला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील नागरिक माठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य