शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
4
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
5
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
6
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
7
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
8
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
9
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
10
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
11
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
12
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
13
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
14
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
15
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
16
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
17
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
18
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
19
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
20
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल

'सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका; राजकीय तडजोड करायला भाजपा तयार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 12:10 IST

काँग्रेसचं देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे.

ठळक मुद्दे घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकीसत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हतासरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका, भाजपाचं शिवसेनेला आवाहन

नाशिक - नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशहिताचे आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी हे देशहितासाठी विधेयक स्वीकारावं, हे विधेयक देशासाठी आवश्यक आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखवावा, कोणाला घाबरू नये, सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. नाशिक येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं लोकसभेत समर्थन केले अन् राज्यसभेत पळून गेले, सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका. नागरिकत्व सुधारणा विधेयक अंमलबजावणी देशासाठी आवश्यक आहे. घुसखोरांना घालवलंच पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं महाराष्ट्रात सरकार आहे त्यामुळे राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं तडजोड करू नये. देशहितासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवर आमचा पराभव झाला आहे. या 12 जागांचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पराभव नेमका का झाला याचा अहवाल सादर करणार आहे. काँग्रेसचं देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हता, राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपचा अजेंडा असल्याचा टोला आशिष शेलार यांनी काँग्रेसला लगावला. 

दरम्यान, शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला आवाहन करत तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं हे ऑटो रिक्षा सरकार आहे. रिक्षा कितीही चांगली असली तरी तिला वेगमर्यादा असतात. या सरकारमध्ये अंतर्गत विरोध खूप आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने हे सरकार कितपत चालेल हे आता सांगता येत नाही. मात्र शिवसेनेने आजही साद दिली तरी आमचे दार उघडेच आहे. आम्ही कधीही हाक द्यायला तयार आहोत पण समोरुन प्रतिसाद यायला हवा असं त्यांनी सांगितले होते. फडणवीसांच्या या विधानावर दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होते. आता वेळ निघून गेली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक