शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

समाजाला साहित्य नक्की हवंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 02:11 IST

आपल्या समाजाला नक्की साहित्य हवंय का ? माणसे काही वाचतात की नाही ? त्यांना त्याची निकड वाटते का, असे प्रश्न साहित्यिक म्हणून आपल्याला पडतो. पण लेखकाने गणितज्ज्ञ रामानुजमसारखे मला येतंय म्हणून मी गणित करतो, अशा भावनेनेच निर्मिती करायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्याम मनोहर यांचा सवाल : कुसुमाग्रज राष्टÑीय साहित्य पुरस्कार वेद राही यांना प्रदान

नाशिक : आपल्या समाजाला नक्की साहित्य हवंय का ? माणसे काही वाचतात की नाही ? त्यांना त्याची निकड वाटते का, असे प्रश्नसाहित्यिक म्हणून आपल्याला पडतो. पण लेखकाने गणितज्ज्ञ रामानुजमसारखे मला येतंय म्हणून मी गणित करतो, अशा भावनेनेच निर्मिती करायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या वतीने श्याम मनोहर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक वेद राही यांना कुसुमाग्रज राष्टÑीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू ई. वायुनंदन आणि कुसुमाग्रज अध्यासनच्या संचालिका प्रा. विजया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.‘मी थोडं काहीतलं आणि बरंचसं बाहीतलं बोलणार आहे,’ असे सांगत श्याम मनोहर यांनी त्यांची मते रोखठोकपणे मांडली. ‘कोणताही राष्टÑीय पुरस्कार मिळाल्याने तो लेखक अन्य भाषकांना प्रथम माहिती होतो. पण तेवढ्यावर ही प्रक्रिया थांबायला नको. तर त्या लेखकाचे साहित्य, त्याचे विचार हे अन्य भाषांमध्ये भाषांतरीत होत पुढे जायला हवे. असे राष्टÑीय स्वरूपाचे साहित्य वाचन करून त्याची यादी नवोदित लेखकांनी तयार करावी. तसेच त्यांचे साहित्य अधिकाधिक भारतीय भाषांमध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने दयाराम पाडलोस्कर आणि योजना यादव यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव दिनेश भोंडे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि मानपत्रवाचन दत्ता पाटील यांनी केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले.मानधन मिळणेहा लेखकाचा हक्कजगभरातील विविध भाषांमधील लेखक काय ज्ञान निर्माण करीत आहेत, ते सजगपणे पाहून त्याचा पट मांडला जायला हवा. लेखकाला पुरस्कार मिळणे, हा त्याचा हक्क नाही, मात्र मानधन मिळणे हा त्याचा हक्क आहे. पण पूर्णवेळ साहित्यिक बनून त्यावरच उपजीविका चालवणे, हे आपल्या संस्कृतीत तरी शक्य नाही. तरीदेखील लेखकाने ध्यासाने लेखन करीत रहावे. रात्री-अपरात्री काही सुचले तरी ते लिहून ठेवावे,’ असेही श्याम मनोहर यांनी सांगितले.बागुल-विशाखा पुरस्कारांचे वितरणविद्यापीठाच्या अन्य राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरणदेखीलकरण्यात आले. बाबूराव बागुल कथा पुरस्कार गोवा येथीलदयाराम पाडलोस्कर (खपली निघाल्यानंतर- २०१७ सालासाठी)तसेच गडचिरोली येथील प्रमोद बोरसरे (पारवा- २०१८ सालासाठी) यांन प्रदान करण्यात आला तर विशाखा काव्याचा प्रथम पुरस्कारनांदेड येथील अमृत तेलंग (काव्य संग्रह: पुन्हा फुटतो भादवा),द्वितीय पुरस्कार पुणे येथील कवयित्री योजना यादव(मरी मरी जाय शरीर), तर नाशिकच्या महेश लोंढे(निद्रानाशाची रोजनिशी) यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्टÑाचा आत्मा महाराष्टÑात : वेद राहीपुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना प्रख्यात साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शक वेद राही यांनी, ‘भारताचा आत्मा हा महाभारतात, तर राष्टÑाचा आत्मा महाराष्टÑात वसलेला आहे. महाभारतात गीता तर महाराष्टÑातील ज्ञानेश्वरीत अद्भुत ज्ञान सामावले आहे. माझा कुसुमाग्रजांशी संबंध त्यांच्या ज्ञानेश्वरीवरील एका पुस्तकामुळे आला. तर नाशिकचेच ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक मो. ग. तपस्वी यांनी ज्ञानेश्वरीवर केलेल्या हिंदी अनुवादामुळे मला ज्ञानेश्वरी उमगली. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव वाचून मी अक्षरश: स्तब्ध झालो होतो.च् वीर सावरकर या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दशर््ान करताना मला खरंच जगणं कशाला म्हणतात, त्याचा अर्थ उमगला. या सर्व कारणांमुळेच माझ्यासाठी हा पुरस्कार खूप विश्ोष आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने माझ्या मनात अजून एक ज्ञानदिवा उजळला आहे, ’ असे सांगत राही यांनी त्यांचे आणि नाशिकचे ऋणानुबंध नमूद केले. यावेळी राही यांनी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचा अनुवाद करीत ‘जाते जाते गाऊंगा मै, गाते गाते जाऊंगा मै’’ हे काव्यदेखील सादर केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक