शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

समाजाला साहित्य नक्की हवंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 02:11 IST

आपल्या समाजाला नक्की साहित्य हवंय का ? माणसे काही वाचतात की नाही ? त्यांना त्याची निकड वाटते का, असे प्रश्न साहित्यिक म्हणून आपल्याला पडतो. पण लेखकाने गणितज्ज्ञ रामानुजमसारखे मला येतंय म्हणून मी गणित करतो, अशा भावनेनेच निर्मिती करायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्याम मनोहर यांचा सवाल : कुसुमाग्रज राष्टÑीय साहित्य पुरस्कार वेद राही यांना प्रदान

नाशिक : आपल्या समाजाला नक्की साहित्य हवंय का ? माणसे काही वाचतात की नाही ? त्यांना त्याची निकड वाटते का, असे प्रश्नसाहित्यिक म्हणून आपल्याला पडतो. पण लेखकाने गणितज्ज्ञ रामानुजमसारखे मला येतंय म्हणून मी गणित करतो, अशा भावनेनेच निर्मिती करायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या वतीने श्याम मनोहर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक वेद राही यांना कुसुमाग्रज राष्टÑीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू ई. वायुनंदन आणि कुसुमाग्रज अध्यासनच्या संचालिका प्रा. विजया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.‘मी थोडं काहीतलं आणि बरंचसं बाहीतलं बोलणार आहे,’ असे सांगत श्याम मनोहर यांनी त्यांची मते रोखठोकपणे मांडली. ‘कोणताही राष्टÑीय पुरस्कार मिळाल्याने तो लेखक अन्य भाषकांना प्रथम माहिती होतो. पण तेवढ्यावर ही प्रक्रिया थांबायला नको. तर त्या लेखकाचे साहित्य, त्याचे विचार हे अन्य भाषांमध्ये भाषांतरीत होत पुढे जायला हवे. असे राष्टÑीय स्वरूपाचे साहित्य वाचन करून त्याची यादी नवोदित लेखकांनी तयार करावी. तसेच त्यांचे साहित्य अधिकाधिक भारतीय भाषांमध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने दयाराम पाडलोस्कर आणि योजना यादव यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव दिनेश भोंडे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि मानपत्रवाचन दत्ता पाटील यांनी केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले.मानधन मिळणेहा लेखकाचा हक्कजगभरातील विविध भाषांमधील लेखक काय ज्ञान निर्माण करीत आहेत, ते सजगपणे पाहून त्याचा पट मांडला जायला हवा. लेखकाला पुरस्कार मिळणे, हा त्याचा हक्क नाही, मात्र मानधन मिळणे हा त्याचा हक्क आहे. पण पूर्णवेळ साहित्यिक बनून त्यावरच उपजीविका चालवणे, हे आपल्या संस्कृतीत तरी शक्य नाही. तरीदेखील लेखकाने ध्यासाने लेखन करीत रहावे. रात्री-अपरात्री काही सुचले तरी ते लिहून ठेवावे,’ असेही श्याम मनोहर यांनी सांगितले.बागुल-विशाखा पुरस्कारांचे वितरणविद्यापीठाच्या अन्य राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरणदेखीलकरण्यात आले. बाबूराव बागुल कथा पुरस्कार गोवा येथीलदयाराम पाडलोस्कर (खपली निघाल्यानंतर- २०१७ सालासाठी)तसेच गडचिरोली येथील प्रमोद बोरसरे (पारवा- २०१८ सालासाठी) यांन प्रदान करण्यात आला तर विशाखा काव्याचा प्रथम पुरस्कारनांदेड येथील अमृत तेलंग (काव्य संग्रह: पुन्हा फुटतो भादवा),द्वितीय पुरस्कार पुणे येथील कवयित्री योजना यादव(मरी मरी जाय शरीर), तर नाशिकच्या महेश लोंढे(निद्रानाशाची रोजनिशी) यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्टÑाचा आत्मा महाराष्टÑात : वेद राहीपुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना प्रख्यात साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शक वेद राही यांनी, ‘भारताचा आत्मा हा महाभारतात, तर राष्टÑाचा आत्मा महाराष्टÑात वसलेला आहे. महाभारतात गीता तर महाराष्टÑातील ज्ञानेश्वरीत अद्भुत ज्ञान सामावले आहे. माझा कुसुमाग्रजांशी संबंध त्यांच्या ज्ञानेश्वरीवरील एका पुस्तकामुळे आला. तर नाशिकचेच ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक मो. ग. तपस्वी यांनी ज्ञानेश्वरीवर केलेल्या हिंदी अनुवादामुळे मला ज्ञानेश्वरी उमगली. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव वाचून मी अक्षरश: स्तब्ध झालो होतो.च् वीर सावरकर या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दशर््ान करताना मला खरंच जगणं कशाला म्हणतात, त्याचा अर्थ उमगला. या सर्व कारणांमुळेच माझ्यासाठी हा पुरस्कार खूप विश्ोष आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने माझ्या मनात अजून एक ज्ञानदिवा उजळला आहे, ’ असे सांगत राही यांनी त्यांचे आणि नाशिकचे ऋणानुबंध नमूद केले. यावेळी राही यांनी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचा अनुवाद करीत ‘जाते जाते गाऊंगा मै, गाते गाते जाऊंगा मै’’ हे काव्यदेखील सादर केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक