शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पीएमएस प्रणाली, अखर्चित निधीवरून जिल्हा परिषद सभेत वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:11 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अखर्चित निधीवर वादळी चर्चा झाली. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना सन २०१८-१९ वर्षातील २३० कोटींचा निधी अखर्चित असल्याच्या कारणावरून सदस्यांनी प्रशासनावर चांगलेच फैलावर घेतले. निधी वेळेत खर्च न झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी केली.

ठळक मुद्देनिधी खर्च न झाल्यास अधिकारी जबाबदार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अखर्चित निधीवर वादळी चर्चा झाली. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना सन २०१८-१९ वर्षातील २३० कोटींचा निधी अखर्चित असल्याच्या कारणावरून सदस्यांनी प्रशासनावर चांगलेच फैलावर घेतले. निधी वेळेत खर्च न झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी केली.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत, संजय बनकर यांनी अखर्चित निधीचा मुद्दा उपस्थित करून वेळेत निधी खर्च का झाला नाही, अशी विचारणा केली. निधीचे नियोजन होऊनही निधी खर्च केला जात नाही, प्रशासकीय मान्यता होऊनही कार्यारंभ मिळालेला नाही, अशा तक्रारी सदस्यांनी केल्या. अशाच प्रकारे कामकाज होणार असेल तर, निधी कसा खर्च होणार? असा सवाल डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केला. कामांना प्रशासकीय मान्यता देऊन, कार्यारंभ आदेश मिळत नसल्याने कामांना सुरुवात झालेली नसल्याचे सिद्धार्थ वानरसे, आश्विनी आहेर यांनी निर्देशनास आणले. विकासासाठी निधी प्राप्त होऊनही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे तो पडून राहत असल्याची तक्रार करण्यात आली. २३० कोटींचा निधी खर्च झालेला नाही हे सत्य आहे. या निधी खर्चासंदर्भात विभागप्रमुखांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. सर्व विभागप्रमुख त्यादृष्टीने कामाला लागले असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वर एस. यांनी सांगून मार्च २०२० अखेर हा निधी खर्च होईल, असे आश्वासित केले. सभेला उपाध्यक्ष नयना गावित, सभापती मनीषा पवार, यतिंद्र पगार, सुनीता चारोस्कर, अर्पणा खोसकर, सामान्य प्रशाासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदरावपिंगळे, ग्रामपंचायत विभागाचे रवींद्र परदेशी यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.बांधकाम विभागातील कामांची बिले काढण्यासाठी असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस)प्रणालीचा फटका बसतो का? अशी विचारणा बनकर, सिद्धार्थ वनारसे यांनी केली. यावर कार्यकारी अभियंत्यांनी याप्रणालीत वेळ जात असल्याने बिले वेळेत निघत नसल्याचे सांगितले. त्यावर मार्च २०२० पर्यंत ही प्रणाली बंद करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, याप्रणाली सुधारणा झाल्याचा दावा भुवनेश्वर एस. यांनी करत, दोन आठवड्यांचा अवधी द्या, अशी मागणी केली. या कालावधीप्रणाली योग्य ती सुधारणा न झाल्यास पूर्वीप्रमाणेच बिले काढली जातील असे भुवनेश्वर एस. यांनी स्पष्ट केले. मार्चअखेर निधी खर्च न झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील त्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे इशारा अध्यक्ष सांगळे यांनी दिला.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक