शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत किसान सभेचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 01:13 IST

दिंडोरी : तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यांसह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हा सेक्रेटरी रमेश मालुसरे यांनी केले.

ठळक मुद्देमोर्चा : संपूर्ण कर्ज माफीसह तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

दिंडोरी : तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यांसह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हा सेक्रेटरी रमेश मालुसरे यांनी केले.सन २०१६ साली नाशिक येथे महामुक्काम मोर्चापासून ६ ते १२ मार्च २०१८ च्या मुंबई लॉँगमार्चच्या काळात अनेक आंदोलने करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या; परंतु मागण्यांची पूर्तता मात्र अद्याप केलेली नाही. मागण्यांची अंमलबजावणी केलेली नाही. यंदा तर भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण दिंडोरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी मोर्चेकºयांनी केली. दिंडोरी बाजार समिती आवारापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान विविध मागण्यांच्या घोषणा देऊन सरकारचा निषेध केला.यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या सभेत रमेश चौधरी, देवीदास वाघ, आप्पावटाणे, सुनील मालसुरे, देवीदास गायकवाड यांनी सरकारचा निषेध केला. मोर्चेकºयांच्या गर्दीमुळेदोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी रमेश चौधरी, देवीदास वाघ, रमेश चतुर, समाधान सोमासे, वसंत गांगोडे, आप्पा वटाणे, परशराम गांगुर्डे, दौलत भोये, हिरामण गायकवाड, श्रीराम पवार, हिरा जोपळे, लक्ष्मीबाई काळे, संजय भोये, दशरथ गायकवाड, अंबादास सोनवणे, रामचंद्र गुंबाडे आदी उपस्थित होते. अशा आहेत मागण्यातालुका दुष्काळी जाहीर करून जनतेच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, वनजमीन दावेदारांना २००५ साली त्यांच्या ताब्यात असलेले व आज कब्जात असलेले पूर्ण चार हेक्टरपर्यंत प्लॉट मंजूर करून त्यांचा नकाशा व सातबारा तयार करावा, संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, जुने रेशनकार्ड बदलवून नवीन रेशनकार्डचे विभाजन करून द्यावे, सर्व वृद्धांना पेन्शन योजना लागू करून दरमहा पाच हजार रु पये मंजूर करावे, जोपर्यंत वनजमीन कसणाºया शेतकºयांचा सातबारा होत नाही तोपर्यंत वनविभागाचे अधिकारी यांचा हस्तक्षेप थांबवावा.बोकड्याची लाच स्वरूपात मागणी माकपाच्या मोर्चात एका मोर्चेकºयाने वनविभागाच्या कर्मचाºयाने लाच स्वरूपात बोकड मागितल्याचा आरोप केला. पेठ तालुक्याचे किसान सभेचे उपाध्यक्ष प्रभाकर गावित यांनी सांगितले की, ननाशी वनपरिक्षेत्रात एका वनहक्क लाभार्थीला झोपडी काढण्यासाठी दमदाटी करण्यात आली. झोपडी काढायची नसेल तर ‘तुझ्याकडचा बोकड्या दे’ असे सांगून बोकड्या नेला. ही बाब पेठच्या मोर्चात अधिकाºयांसमोर उघडकीस आणली असता वनविभागाच्या अधिकाºयांनी बोकड्या देण्याचे कबूल केले; परंतु अद्याप बोकड्या न आणून दिल्याची माहिती गावित यांनी मोर्चात सांगताच वनविभागाचा मोर्चेकºयांनी निषेध केला.