शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पावसाळी गटारी असतानाही एम.जी. रोडवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST

नाशिक : शहरातील एकमेव चांगला आणि पंचवीस वर्षांत एकही खड्डा न पडलेला महात्मा गांधी रोड हा पावसाळी गटारीसाठी फोडण्याच्या ...

नाशिक : शहरातील एकमेव चांगला आणि पंचवीस वर्षांत एकही खड्डा न पडलेला महात्मा गांधी रोड हा पावसाळी गटारीसाठी फोडण्याच्या स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावरून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महापालिका आणि ज्यांनी हा रस्ता बनवला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या कडेला अगोदरच पावसाळी गटारी तयार करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुरेशी माहिती न घेताच हा रस्ता फोडण्याचा प्रकार म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा अशी स्मार्ट सिटी कंपनीची स्थिती असल्याची टीका होत आहे. स्मार्ट सिटीचा प्रत्येक प्रकल्प वादग्रस्त ठरत असतानाच गावठाणातील खोदकाम आणि रस्त्याची उंची आणखी कमी करून पुराचा धोका वाढवण्याचा आरोप होत आहे. त्यातच आता गावठाणातील जे आणखी काही रस्ते खोदण्याचे प्रस्ताव आहे, त्यात एम. जी. रोडचादेखील समावेश करण्यात आला आहे. नाशिकमधील एम.जी. रोड हा नाशिक शहरातील सर्वाधिक मजबूत आणि आदर्श रोड मानला जातो. त्याचे तोडकाम करण्याच्या प्रस्तावामुळे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या रस्त्यावर पावसाळी गटारी टाकण्याचे काम स्मार्ट सिटी करणार असलीतरी मुळात या रस्त्याच्या कडेला अगोदरच पावसाळी गटारी असल्याची माहिती महापालिकेचे काही आजी-माजी अधिकारी आणि संबंधित रस्त्याचे काम करणारे शिवराम कडभाने यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. त्याचदरम्यान म्हणजेच १९९२ महापालिकेने महात्मा गांधी रोडचे काम करण्यासाठी निविदा मागवली होती. साधारणत: दोनशे ते अडीचशे मीटरचा हा रस्ता प्रायोगिक तत्त्वावर ट्रिमिक्स काँक्रिटकरणाचा पहिला प्रयोग म्हणून हाती घेण्यात आला होता. या रस्त्यावर ३५ लाख रुपये खर्च झाले आणि अत्यंत मजबूत रस्ता तयार झाला. अत्यंत गुळगुळीत असा हा रस्ता नंतर कितीही तंत्रज्ञान बदलले आणि स्मार्ट सिटीने १ किलोमीटर रस्त्यासाठी १७ कोटी रुपये खर्च केले तरीही तो साकारलेला नाही.

या रस्त्याच्या अडीचशे मीटर लांबीत दर तीस मीटर अंतरावर डक्ट असून, त्यातून जलवाहिनी सारख्या सर्व्हिसलाइन टाकण्याची सोय आहे. तसेच पावसाळी गटारीसाठी चेंबर्सचीदेखील सोय करण्यात आली आहे. अर्थात, या ठिकाणी पाणी किती साचते याचा शास्त्रीय अभ्यास करून ही व्यवस्था केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने या रस्त्याची कोणतीही माहिती न घेता पावसाळी गटारी टाकण्याचा केलेला अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न केला जात आहे.

इन्फो..

पावसााळी पाण्याचा शास्त्रीय अभ्यास

महापालिकेने हा रस्ता तयार करताना पावसाच्या पाण्याचा शास्त्रीय अभ्यास केला आहे. गोळे कॉलनीतील पाणी अशोक स्तंभाकडे वाहून जाते. स्टेडियम कॉम्प्लेक्समधील साचलेले पाणी तेथेच असते. तेही एम.जी. रोडवर येत नाही. एम. जी. रोडवर पाणी साचत नाही आणि साचले तरी उतारामुळे ते चटकन वाहून जाते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून रस्ता तयार करताना व्यवस्था केल्या असून, त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांत एकदाही या ठिकाणी पाणी साचलेले नाही. मात्र, ही सर्व माहिती कंपनीने घेतलेलीच नाही.