शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

पावसाळी गटारी असतानाही एम.जी. रोडवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST

नाशिक : शहरातील एकमेव चांगला आणि पंचवीस वर्षांत एकही खड्डा न पडलेला महात्मा गांधी रोड हा पावसाळी गटारीसाठी फोडण्याच्या ...

नाशिक : शहरातील एकमेव चांगला आणि पंचवीस वर्षांत एकही खड्डा न पडलेला महात्मा गांधी रोड हा पावसाळी गटारीसाठी फोडण्याच्या स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावरून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महापालिका आणि ज्यांनी हा रस्ता बनवला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या कडेला अगोदरच पावसाळी गटारी तयार करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुरेशी माहिती न घेताच हा रस्ता फोडण्याचा प्रकार म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा अशी स्मार्ट सिटी कंपनीची स्थिती असल्याची टीका होत आहे. स्मार्ट सिटीचा प्रत्येक प्रकल्प वादग्रस्त ठरत असतानाच गावठाणातील खोदकाम आणि रस्त्याची उंची आणखी कमी करून पुराचा धोका वाढवण्याचा आरोप होत आहे. त्यातच आता गावठाणातील जे आणखी काही रस्ते खोदण्याचे प्रस्ताव आहे, त्यात एम. जी. रोडचादेखील समावेश करण्यात आला आहे. नाशिकमधील एम.जी. रोड हा नाशिक शहरातील सर्वाधिक मजबूत आणि आदर्श रोड मानला जातो. त्याचे तोडकाम करण्याच्या प्रस्तावामुळे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या रस्त्यावर पावसाळी गटारी टाकण्याचे काम स्मार्ट सिटी करणार असलीतरी मुळात या रस्त्याच्या कडेला अगोदरच पावसाळी गटारी असल्याची माहिती महापालिकेचे काही आजी-माजी अधिकारी आणि संबंधित रस्त्याचे काम करणारे शिवराम कडभाने यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. त्याचदरम्यान म्हणजेच १९९२ महापालिकेने महात्मा गांधी रोडचे काम करण्यासाठी निविदा मागवली होती. साधारणत: दोनशे ते अडीचशे मीटरचा हा रस्ता प्रायोगिक तत्त्वावर ट्रिमिक्स काँक्रिटकरणाचा पहिला प्रयोग म्हणून हाती घेण्यात आला होता. या रस्त्यावर ३५ लाख रुपये खर्च झाले आणि अत्यंत मजबूत रस्ता तयार झाला. अत्यंत गुळगुळीत असा हा रस्ता नंतर कितीही तंत्रज्ञान बदलले आणि स्मार्ट सिटीने १ किलोमीटर रस्त्यासाठी १७ कोटी रुपये खर्च केले तरीही तो साकारलेला नाही.

या रस्त्याच्या अडीचशे मीटर लांबीत दर तीस मीटर अंतरावर डक्ट असून, त्यातून जलवाहिनी सारख्या सर्व्हिसलाइन टाकण्याची सोय आहे. तसेच पावसाळी गटारीसाठी चेंबर्सचीदेखील सोय करण्यात आली आहे. अर्थात, या ठिकाणी पाणी किती साचते याचा शास्त्रीय अभ्यास करून ही व्यवस्था केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने या रस्त्याची कोणतीही माहिती न घेता पावसाळी गटारी टाकण्याचा केलेला अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न केला जात आहे.

इन्फो..

पावसााळी पाण्याचा शास्त्रीय अभ्यास

महापालिकेने हा रस्ता तयार करताना पावसाच्या पाण्याचा शास्त्रीय अभ्यास केला आहे. गोळे कॉलनीतील पाणी अशोक स्तंभाकडे वाहून जाते. स्टेडियम कॉम्प्लेक्समधील साचलेले पाणी तेथेच असते. तेही एम.जी. रोडवर येत नाही. एम. जी. रोडवर पाणी साचत नाही आणि साचले तरी उतारामुळे ते चटकन वाहून जाते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून रस्ता तयार करताना व्यवस्था केल्या असून, त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांत एकदाही या ठिकाणी पाणी साचलेले नाही. मात्र, ही सर्व माहिती कंपनीने घेतलेलीच नाही.