शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 17:43 IST

मालेगाव : अत्यल्प पावसामुळे खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम देखील यंदा वाया गेला असून फळबागा जगविण्यासाठी किमान चणकापूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालेगाव : अत्यल्प पावसामुळे खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम देखील यंदा वाया गेला असून फळबागा जगविण्यासाठी किमान चणकापूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.हरणबारी धरणाचे आवर्तन सिंचनासाठी सोडण्यात आल्याने मोसम खोरञयास दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना या आवर्तनामुळे सुटणार आहे. मालेगाव, सटाणा व देवळा तालुक्यात पाण्याअभावी खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम वाया गेल्यात जमा आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे फळबागा जगविण्याची धडपड शेतकºयांमध्ये केली जात आहे. चणकापूरचे किमान एक आवर्तन सिंचनासाठी सोडल्यास डाळिंब, पेरू, बोर, आवळा आदि फळबागा शेतकºयांना वाचविता येणार आहे. पाणी न मिळाल्यास लाख मोलाच्या या बागा नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.चणकापूरचे आवर्तन मालेगावसह दाभाडी, बारागाव योजनेस पिण्यासाठी सोडण्यात आले; मात्र आवर्तन सोडण्यात आल्यानंतर वीज वितरणतर्फे कालव्यावरील सर्व कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येवून शेतकºयांची कोंडी केली गेली. विकतचे पाणी घेवून फळबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. कर्जबाजारी शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नाही. वास्तव पिण्याच्या पाण्याबरोबरच पाटबंधारे विभागाने सिंचनासाठी पाणी सोडत या भागातील फळबागधारक शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. पवार यांच्यासह जगदीश पवार, संदीप पवार, अनिल पवार, दादा हिरे, सतिष पवार, गोकुळ म्हसदे आदिंनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी