शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनस्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST

भगूर : येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, जयप्रकाश जातेगावकर ...

भगूर : येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, जयप्रकाश जातेगावकर यांना नाशिक येथे पुढील महिन्यात होणाऱ्या साहित्य संमेलनात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ अथवा व्यासपीठाला ‘स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर’ असे नाव देण्यात यावे या मागणीसह विविध विषयांवर निवेदन देण्यात आले आहे.

नाशिक नगरी आद्य साहित्यिक, महाकवी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जन्मभूमी असून या नगरीत कुसुमाग्रज, वसंत कानेटकर आदी नावांचे एक वलय आहे. त्यापैकी नाशिकचे भूमिपुत्र असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, उत्कृष्ट वक्ते असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकार्याबरोबरच अनेक ग्रंथ, कादंबऱ्या, पोवाडे, काव्यसंग्रह, वार्तापत्रे व इतर पुस्तकांचे अनुवाद, इतिहास लेखन, भाषाशुद्धी असे सर्वच क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी केलेली आहे. त्यांच्या कार्यामुळे १९३८ साली मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले होते. या वर्षी त्यांच्याच जन्म व कर्मभूमीत होणारे साहित्य संमेलन हा सुवर्णयोग जुळून आलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमी असलेल्या भगूर येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने संस्थापक मनोज कुवर, मंगेश मरकड, डॉ. मृत्युंजय कापसे, योगेश बुरके, प्रशांत लोया, भूषण कापसे आदींनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची भेट घेत साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भव्य प्रतिमा अथवा मूर्ती ठेवून पूजन करावे, सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव साहित्य संमेलनात मांडण्यात यावा, संमेलनादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात यावे, सावरकरांचे समग्र साहित्य जनमानसात पोहोचावे यासाठी विशेष स्टॉलची उभारणी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात यावी, सावरकरांची जन्मभूमी भगूर तसेच त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली नाशिक व भगूरमधील काही ठिकाणे तसेच त्यांची ग्रंथसंपदा व मराठी साहित्यातील त्यांचे योगदान याबाबत एक ध्वनिफीत संमेलनात दाखविण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली.

फोटो कॅप्शन २८सावरकर

सावरकर समूहाच्या वतीने निवेदन देताना मनोज कुवर, डॉ. मृत्युंजय कापसे, संजय करंजकर.