शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

अडथळा ठरणारे बॅरिकेड््स हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:04 AM

नाशिक आणि सिन्नरला जोडणारा भगूर येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपासून लोकार्पण सोहळ्याअभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. सदर पुलाचे काम पूर्णत्वात आले असले तरी उद्घाटनाचा मुहूर्त नसल्याने पुलाचा वापर होऊ नये म्हणून पुलाच्या मार्गावर टाकलेले लोखंडी बॅरिकेड्स राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी हटविले आहे.

भगूर : नाशिक आणि सिन्नरला जोडणारा भगूर येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपासून लोकार्पण सोहळ्याअभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. सदर पुलाचे काम पूर्णत्वात आले असले तरी उद्घाटनाचा मुहूर्त नसल्याने पुलाचा वापर होऊ नये म्हणून पुलाच्या मार्गावर टाकलेले लोखंडी बॅरिकेड्स राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी हटविले आहे.येथील विजयनगर चौफुली ते नाका नं. २ पर्यंतचा भगूर रेल्वेगेटवरील सिन्नर-नाशिकला जोडणारा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभाग केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे लोकार्पण होत नसल्यामुळे या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड््स टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली पुलावरील लोखंडी बॅरिकेड हटविण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात आला.या कामाचा पूर्णत्वाचा कालावधी १८ महिने असताना या कामासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी लोकार्पण सोहळ्याला आचारसंहिता व मंत्र्यांची तारीख मिळत नसल्यामुळे रेल्वे खात्याकडून उड्डाण पुलावर लोखंडी बॅरिकेड टाकण्यात आले होते. या लोखंडी बॅरिकेडमुळे लोकांना अडचण होत असून, दोन वेळा अपघात झाले व यापुढेदेखील जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे. पुलावर पथदीपदेखील बसविले नाहीत त्यामुळे धोका अधिक वाढलेला आहे. पूल सुरू व्हावा यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही तांत्रिक कारणे सांगून पुलाचे उद्घाटन टाळले जात असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, देवळाली कॅम्प कार्याध्यक्ष प्रशांत बच्छाव, विशाल बलकवडे, बिसमिल्ला खान, आनंद झांजरे, नीलेश गोरे, अमोल पाटील, राहुल कापसे, मंजूषा महेश, गायत्री झांजरे, स्वाती मोरे, संगीता झाजरे, साहील मोरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकरते उपस्थित होते.स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणीउड्डाणपुलाच्या बाजूलाच नूतन माध्यमिक शाळा व कॉलेज असल्यामुळे वाहनांचे वेग नियंत्रणात राहण्यासाठी दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली. तसेच भगूरच्या व्यापाऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वेखालील बोगद्याचे कामदेखील लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक