शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय : जिल्हा बॅँकेचा गाडा रूतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:08 IST

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वप्रकारच्या पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील जिल्हा बॅँकांचे आर्थिक गणित बिघडणार असून, नाशिकसह राज्यातील बॅँकांच्या सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या वसुलीला ब्रेक लागला आहे.

नाशिक : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वप्रकारच्या पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील जिल्हा बॅँकांचे आर्थिक गणित बिघडणार असून, नाशिकसह राज्यातील बॅँकांच्या सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या वसुलीला ब्रेक लागला आहे. सरकारने दिलेल्या स्थगितीतून मार्ग कसा काढावा? असा प्रश्न बॅँकांना पडलेला असताना आता साºयांच्या नजरा केंद्र सरकारच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमाफीकडे लागल्या आहेत.  यंदा कमी पर्जन्यमानामुळे राज्यावर दुष्काळी परिस्थिती ओढवली असून, शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी लागू केलेल्या प्रणालीनुसार १५१ तालुक्यांमध्ये व २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना लागू करतानाच त्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत सर्व प्रकारच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. मुळातच गेल्या वर्षी शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यास अद्यापही शेतकरी पुढे येत नसल्यामुळे जिल्हा बॅँकांना सन २०१६-१७ या वर्षी वाटप केलेले शेकडो कोटींचे पीक कर्जवसुलीत अडचणी आल्या आहेत.जेमतेम शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला, परंतु दीड लाखांहून अधिक पीककर्ज घेतलेल्या शेतकºयांनी या योजनेकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे बॅँकांची कर्जवसुली होऊ शकली नाही. परिणामी यंदा खरिपासाठी पीककर्ज देण्यास तसेही जिल्हा बॅँकांकडे पुरेसा निधी उपलब्ध नव्हता, त्यातच पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यामुळे तसेही शेतकºयांनी बॅँकांच्या कर्जवसुली पथकाला माघारी पाठविले होते. अशा परिस्थितीत शासनाने कर्जवसुलीला अधिकृत स्थगिती दिल्यामुळे त्याचा थेट परिणाम जिल्हा बॅँकांवर होणार आहे. एकट्या नाशिक जिल्हा बॅँकेच्या २१०० कोटी रुपयांची कर्जवसुली थांबणार असून, राज्यातील ३२ जिल्हा बॅँकांचा विचार करता ही रक्कम जवळपास ४० ते ४५ हजार कोटी रुपयांची रक्कम अडकून पडणार आहे. मुळातच शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची शेकडो कोटी रक्कम अद्यापही जिल्हा बॅँकांना मिळालेली नाही.अशा परिस्थितीत शासनाने निव्वळ पीककर्जच नव्हे तर शेतीशी निगडीत सर्व प्रकारच्या कर्जवसुलीला स्थगिती दिल्यामुळे बॅँकेकडे दैनंदिन जमा होणाºया सर्व प्रकारच्या वसुलीलाच ब्रेक लागल्याने त्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. त्यामुळे आता बॅँकांना केंद्र सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफीची आस लागून असून, तसे झाल्यास जिल्हा बॅँका मालामाल होतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.स्थगिती दिली, व्याजाचे काय?राज्य सरकारने दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांकडील शेतीशी निगडीत कर्जवसुलीला तब्बल पुढच्या खरीप हंगामाती पीक निघेपर्यंत म्हणजेच ३१ आॅक्टोंबर २०१९ पर्यंत स्थगिती दिली असली तरी, जवळपास दहा महिने थकीत कर्जावरील व्याजाचे काय याचा कोणताही खुलासा शासनाने केलेला नाही. त्यामुळे बॅँकांना कर्जवसुलीचा फटका बसण्याबरोबर शेकडो कोटी थकलेल्या रकमेवरील व्याजावरही पाणी फेरावे लागते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.शासनाने कर्जवसुलीला स्थगिती दिल्यामुळे जिल्हा बॅँकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. बॅँका वाचविण्यासाठी शासनाने आता दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी दीड लाखांच्या कर्जाची रक्कम बॅँकांच्या खात्यात जमा करावी व त्यावरील रक्कम शेतकºयाच्या नावावर कर्ज रूपाने ठेवावी तसे झाल्यास बॅँकांना भांडवल उपलब्ध होईल शिवाय शेतकºयांच्या कर्जाचा बोझाही कमी होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारने शेतकºयांच्या कर्जमाफीचा विचार सुरू केला आहे, त्यामुळे जिल्हा बँकेला १७०० कोटी रुपये मिळू शकतील. - केदा अहेर, अध्यक्ष, जिल्हा बॅँक

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीGovernmentसरकार