शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

दप्तर दिरंगाईचा फटका

By किरण अग्रवाल | Published: May 20, 2018 1:12 AM

कळवण, त्र्यंबकेश्वर व देवळा या तीन तालुक्यांमधील ३३ ग्रामपंचायतींसाठी तर एकही अर्ज आलेला नाही. म्हणायला राजकीय उदासीनता याला म्हणता येईल.

ठळक मुद्देनिवडणूक लढविण्यासाठी जातीचे दाखले मिळू शकलेले नाहीत. जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

अलीकडच्या काळात राजकारणाकडे लोकांचा कल वाढला असल्याचे सरधोपटपणे बोलले जात असले तरी, ते तितकेसे खरे म्हणता येऊ नये. कारण, जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांमध्ये ३३ ठिकाणी एकही अर्ज दाखल न झाल्याने तेथे पुन्हा पोटनिवडणुका घेण्याची वेळ आली आहे. अर्थात, प्रशासकीय यंत्रणांची बेपर्वाई कशी ग्रामस्थांच्या अधिकारांवर गदा आणणारी ठरते याचे प्रत्यंतरही यानिमित्ताने यावे. कारण, जातीच्या दाखल्यांअभावीच संबंधित ठिकाणच्या निवडणुकांत उमेदवारांचा प्रतिसाद मिळू शकलेला नाही.

जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, ३२८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकांची कार्यवाही सुरू आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उलटून गेल्यावर जी आकडेवारी हाती आली आहे, ती स्तिमित करणारीच म्हणायला हवी. कारण, पोटनिवडणुकांमध्ये ३२८ पैकी फक्त ७ जागांवरच निवडणूक घेण्यासारखे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कळवण, त्र्यंबकेश्वर व देवळा या तीन तालुक्यांमधील ३३ ग्रामपंचायतींसाठी तर एकही अर्ज आलेला नाही. म्हणायला राजकीय उदासीनता याला म्हणता येईल. कारण, राजकारण करायला व निवडून जायला सारेच उत्सुक असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणातील ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज येऊ नये ही बाब आश्चर्याचीच म्हणता यावी. परंतु ते खरे नाही. कारण, यातील बहुसंख्य जागा या अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. गेल्या सुमारे तीन वर्षांपासून तेथील निवडणुकांसाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. परंतु, ही प्रक्रियाच पार पडू शकलेली नाही. कारण, निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक ठरणारे जातीचे दाखले संबंधितांना मिळू शकलेले नाहीत.

यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणांकडून चालढकल केली जात असल्याने किंवा गांभीर्य बाळगून दाखले वितरणाचे काम केले जात नसल्यानेच याठिकाणी वारंवार पोटनिवडणुका घोषित करण्याची वेळ आली आहे. ग्रामस्थांच्या अधिकारांवर गदा आणणारीच ही बाब म्हणायला हवी. शिवाय निवडणुका पार पडून लोकनियुक्त सरपंच व सदस्यांची व्यवस्था आकारास येत नसल्याने या गावांचा विकास खोळंबल्याचे जे चित्र दिसून येत आहे ते वेगळेच. तेव्हा निवडणुका व पोटनिवडणुकांचा शासकीय कार्यक्रम घोषित करून न थांबता किंवा सदर ठिकाणी उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याचे कारण देऊन पुन्हा नव्याने पोटनिवडणुकांच्या तयारीला न लागता अगोदर अनुसूचित जमातीच्या दाखल्यांचे वितरण कसे करता येईल याचा विचार केला जाणे गरजेचे ठरावे. जिल्ह्यातील सुमारे तीनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका घोषित होऊनही त्या उमेदवारांअभावी पार पाडता येऊ नये हे तसे पाहू जाता प्रशासकीय यंत्रणांचेच अपयश ठरावे. याचसंदर्भाने तेथील विकास खोळंबला आहे, त्याचे अपश्रेयही या यंत्रणेलाच देता यावे. राजकारणा बद्दलची उदासीनता यामागे नाही, तर यंत्रणांची दाखले वितरणासंबंधीची दप्तर दिरंगाई कारणीभूत आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषदNashikनाशिकVidhan Parishadविधान परिषद