शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

मुसळधार पावसाने,कांदा मका पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 10:58 PM

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांसह कांदा पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे.

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांसह कांदा पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने अक्षरश: पिके भुईसपाट झाली आहेत. देवळा पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात सुरुवातीपासूनच या वर्षी पावसाने अक्षरश: कहर केला आहे. या भागातील तिन्ही हंगामातील प्रमुख पिक कांदा आहे. कांदयावरच या भागातील शेतकरीवर्गाचे अथर्कारण अवलंबून असते. मात्र या वर्षी पावसाने आणि रोगट हवामानाचा प्रतिकुल परिणाम कांदा रोपावर झाला आहे. यामुळे कांदा रोप मिळणे कठीण झाले आहे आणि शेतातील रोपं जगवण्यासाठी महागडी औषधे फवारणी करूनही फायदा झाला नाही. काही शेतकरी यांनी कसेबसे कांदा लागवड केलीही परंतु कांदा उगवण क्षमता कमी झाल्याने आणि उगवलेला कांदयावरच रोगराईचे आगमन झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पिके नांगरणी करून पिके मोडून टाकलीत. अधूनमधून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे बळीराजा कमालीचा आर्थिक कोंडीत सापडला आहे .कालच्या पावसाने तर काढणीवर आलेली बाजरी पिक भुईसपाट झाली आहेत त्यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणावर बाजरी पिकांची पेरणी करूनही शेतकरी यांना बाजरीचे उत्पन्न हाती मिळणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे. मका पिकांचीही मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभा असलेला मका शेतातच आडवा झाला आहे. भुईमूगाचेही नुकसान होत असुन खरीपाचे पिकांबरोबरच या भागातील नगदी पिक कांदा ही बळीराजास रडवू लागले आहेत. काल अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेतातून पाणी वाहू लागले आहे. पाऊस असुनही पिके कोणतीच येणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. 

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस