संततधार पावसाने घराचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:23 IST2020-08-14T22:08:07+5:302020-08-15T00:23:41+5:30
इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.

संततधार पावसाने घराचे नुकसान
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.
तसेच नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रूक आदी परिसरात पावसाचा जोर वाढत असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर या सतत चाललेल्या संततधारेमुळे नांदूरवैद्य येथे एका घराची भिंत कोसळल्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, घराच्या बाजूला असलेला वीजपुरवठा करणाºया खांबाचे नुकसान झाले असून, वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (दि. १३) रोजी घडली असून, यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
सदर नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्यात येऊन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त व्यक्तीने केली
आहे. यावर्षी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी शेतीला पुरेसा व मुबलक पाऊस पडत असल्यामुळे बळी राजाने समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यातदेखील वाढ झाल्याने विसर्गर्ही सुरू आहे.
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील रहिवाशी असलेल्या नंदाबाई शशिकांत रोकडे यांच्या घराची संततधारेमुळे भिंत कोसळून नुकसान झाले असून, विजेच्या खांबाचेदेखील नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची घटना नांदूरवैद्य येथे घडली आहे. सुदैवाने या भिंतीमुळे व वीजवाहिन्या तुटल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठे झाले आहे. लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त महिलेने केली आहे.