शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

पिकांची लागवड आली धोक्यात; मका, सोयाबीन पीक सुकण्यास सुरुवात, शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 16:05 IST

यंदा बळीराजाला खरीप हंगामातील पिकांच्या मशागती व लागवडीसाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली होती.

रोहन वावधाने

मानोरी,जि. नाशिक (रोहन वावधाने) : यंदा रिमझिम पावसाच्या भरवशावर झालेली खरीप हंगामातील मका, सोयाबीन, बाजरी आदी पिकांची लागवड अपुऱ्या पावसाअभावी धोक्यात आली असून उष्णतेत वाढ होत चालल्याने पीक सुकण्यास सुरुवात झाली असून पुढील पाच ते सहा दिवसांत दमदार पाऊस न पडल्यास खरीप हंगाम धोक्यात येणार असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे चित्र येवला तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे.

यंदा बळीराजाला खरीप हंगामातील पिकांच्या मशागती व लागवडीसाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली होती. उसनवारी व उधारी करून बियाणे खतांची खरेदी बळीराजाने करून ठेवली होती; मात्र जून, जुलै महिन्याच्या सुरुवातीला देखील दमदार पावसाने पाठ फिरवल्याने रिमझिम पावसाचा आधार घेऊन जीव मुठीत धरून पिकांची पेरणी करण्याची नामुष्की बळीराजावर ओढवली होती.

यंदा बियाणे खतांच्या किमतीत वाढ झाल्याने खरीप हंगामातील मशागतीचा व बियाण्यांचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यात पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने पिके अधूनमधून पडणाऱ्या उष्णनेते होरपळून चालली असल्याचे देखील चित्र मानोरी, देशमाने, जळगाव नेऊर, पुरणगाव आदी परिसरात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून पिकांना जीवदान देण्यासाठी स्प्रिंकलर द्वारे मका, सोयाबीन पिकांना पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

कांदा अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे विहीर, तळ्यामध्ये असलेला पाण्याचा साठा उष्णतेने मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. मार्च महिन्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून शासनाने १५ ऑगस्टपर्यंत अनुदान देण्याची माहिती दिली असता १५ तारीख होऊन सहा दिवस उलटले असून अद्यापही शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.

यंदा अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील पावसाने ओढ दिल्याने उष्णतेने पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने जाहीर केलेले कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना तत्काळ द्यावे. तसेच, टोमॅटोची निर्यात वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच, दुष्काळी परिस्थिती बघून शेतकऱ्यांना दिलासा देऊन आधार देणे गरजेचे झाले आहे.- संतोष मुळक, शेतकरी, निफाड.

पाऊस लांबल्याने पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. विहिरीत असलेले जलसाठे कोरडे झाले असून पिकांना दमदार पाऊस गरजेचा झाला आहे. पालखेड आवर्तनातून चाऱ्यांना पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा पाऊस न झाल्यास पुढील काही दिवसांत पिके उघड्या डोळ्या समोर जळून जाणार आहे.

- विनायक भालके, शेतकरी, देशमाने.

टॅग्स :Nashikनाशिक