शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

CoronaVirus News : ना जत्रा, ना यात्रा, गावाेगावी कोरोनाचा खतरा; तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 18:48 IST

सचिन सांगळे नांदूरशिंगोटे : गत दोन वर्षांपासून सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे यावर्षी ग्रामीण भागातील गावागावांतील जत्रा भरतील, ...

सचिन सांगळे

नांदूरशिंगोटे : गत दोन वर्षांपासून सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे यावर्षी ग्रामीण भागातील गावागावांतील जत्रा भरतील, असे वाटत असतानाच पुन्हा ओमायक्रॉनचे संकट उभे राहिले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला तो मोलमजुरी करणाऱ्या तसेच गावच्या जत्रांवर अवलंबून असलेल्या तमाशा, ऑर्केस्ट्रा, मंडप डेकोरेटर, खेळणीसह विविध प्रकारचे दुकानदार या व्यावसायिकांना. सध्या यात्रांचा हंगाम असला तरी कोरोनामुळे यात्रा बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद असून या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

चंपाषष्ठीनंतर ग्रामीण भागातील यात्रा उत्सव सुरू होतो. यात्रा म्हटले की वर्षभरातील कामातून वेळ काढून देवदेवतांचे दर्शन आणि निखळ मनोरंजन एक हौस वेगळीच असते. यादरम्यान, नोकरी कामधंद्यासाठी गाव सोडून इतरत्र गेलेले ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहकुटुंब गावाला येत असतात. त्याचप्रमाणे सासुरवाशीण मुली-महिला आपल्या माहेराला, पाहुणे मोठ्या उत्साहाने यात्रेस येत असतात. दोन दिवसांच्या या यात्रेत देवदेवतांची पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य, ढोल, लेझीम, छबिना, मिरवणूक, आरती, कुस्त्या व ऑर्केस्ट्रा, तमाशा असे मनोरंजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले जातात. त्यामुळे जत्रेचा एक वेगळाच आंनद अनुभवयास मिळत असतो. गावातील रथ मिरवणुकीत आबालवृद्धांसह तरुण वर्ग तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. मात्र कोरोनाच्या संकटाने सर्वांचाच हिरमोड झाला आहे. २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तर यावर्षी ओमायक्रॉनचे संकट वाढत असल्यामुळे शासनाने पर्यटनासह विविध कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे यावर्षी ओमायक्रॉनमुळे या सर्वांवर विरजण पडले आहे. सध्या तालुक्यातील विविध भागांतील यात्रा, उत्सव सुरू झाले आहेत. मात्र, अगदी साध्या पद्धतीने हे सण, उत्सव साजरे करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील गावे या चार महिन्यांत खूप गजबजलेली असतात परंतु आता कोरोनामुळे जत्रा असूनदेखील गजबजलेली गावे अगदी शांत वाटत आहेत.

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे जत्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विविध खेळणी, फरसाण, भेळ, जेवण बनवणारे केटरर्सवाले, ढोल-लेझीम खेळ, झांज पथके, ऑर्केस्ट्रा हे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत. तर तमाशा कलावंतांवर तीन वर्षांपासून जत्राच भरत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या