शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

जिल्हा परिषदेच्या गटांची रचना दीड महिन्यात

By admin | Updated: August 20, 2016 01:37 IST

निवडणुकीचे पडघम : गट, गणांची संख्या कायम

नाशिक : फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाने गट व गणांच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून, ९ सप्टेंबरपर्यंत तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील गट व गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्णात नवीन नगरपंचायतींच्या निर्मितीनंतर गट, गणाच्या संख्येत घट होण्याची व्यक्त होणारी भीती निरर्थक असून, फक्त सात तालुक्यांमधील गट व गणांच्या रचनेत मोठा बदल होवून सदस्यांची संख्या मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांबरोबरच पंधराही पंचायत समित्यांचीही मुदत फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येत आहे, तत्पूर्वीच नवीन सदस्यांची निवड करणे क्रमप्राप्त असल्याने त्याच्या प्रशासकीय तयारीला राज्य निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. प्रत्येक गट व गणाची पुनर्रचना तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणातही बदल होणार आहे.होऊ घातलेल्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यांपैकी ३७ जागा म्हणजेच ५० टक्के यंदा पहिल्यांदाच महिलांसाठी राखीव राहणार आहेत, तीच परिस्थिती पंचायत समित्यांमध्ये म्हणजेच गणांच्या निवडणुकीत राहणार आहे. या गट व गण रचनेसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार असल्याने साधारणत: ४२ हजार मतदारांचा समावेश गटाच्या रचनेत करण्यात येणार आहे. तहसीलदारांनी ९ सप्टेंबर रोजी प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करावा, अशा सूचना असून, २३ सप्टेंबरपर्यंत विभागीय आयुक्तांनी या प्रस्तांवाची छाननी करून त्यास मान्यता देणे व ५ आॅक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर गट, गणाची रचना व आरक्षणाबाबत हरकती नोंदविण्याचीही संधी उमेदवारांना देण्यात आली आहे.  (प्रतिनिधी)