शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आयोगाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 2:35 PM

मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणूकी बरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणा-या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती.

ठळक मुद्देग्रामपंचायतीसाठी सोमवारी मुदत : छाननीही लांबणीवरछाननीही लांबणीवर टाकली

नाशिक : मार्च ते मे महिन्यात मुदत संपणा-या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन प्रत्यक्षात नामांकन दाखल करण्याची अंतीम मुदत समीप आलेली असताना राज्य निवडणूक आयोगाने आपल्या ‘गोंधळी’ कारभाराची पुन: प्रचिती दिली असून, निवडणूकीचे नामांकनास मुदतवाढ देतानाच छाननीही लांबणीवर टाकल्यामुळे राज्यभरातील उमेदवार व निवडणूक अधिका-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणूकी बरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणा-या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती. आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार ५ ते १० फेब्रुवारी दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान उमेदवारांनी आॅनलाईन नामांकन दाखल करण्याची मुदत दिली होती. १२ फेब्रुवारी रोजी छाननी तर माघारीसाठी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतीम मुदत होती. मतदानासाठी २५ फेब्रुवारी व दुस-याच दिवशी मतमोजणी करून निवडणूक निकाल असा कार्यक्रम आयोगाने जाहीर करताना या निवडणुकीत राखीव जागांवर उमदेवारी करणा-या उमेदवारांनी नामांकनासोबत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले होते. आयोगाच्या या निर्णयामुळे राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती, त्याचा परिणाम निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यात झाला होता. आयोगाच्या या लहरी फतव्यामुळे उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्य सरकारला त्यात हस्तक्षेप करावा लागला व मंत्रीमंडळ बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली. राज्य सरकारचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या निवडणूक अधिसुचनेत बदल केला. हे कमी की काय शनिवार दि. १० रोजी ग्रामपंचायतींचे नामांकन स्विकारण्याची अंतीम मुदत असताना आयोगाने शुक्रवारी रात्री आपल्या निवडणूक कार्यक्रमातच आश्चर्यकारकरित्या बदल केला.नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार आता सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करण्याची मुभा देण्यात आली असून, दि. १४ रोजी छाननी, १६ रोजी माघार व २७ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन दुस-या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. आयोगाच्या या ऐनवेळच्या फतव्यामुळे निवडणूक अधिका-यांची धावपळ उडाली असून, शनिवार, रविवारी सुटी आल्याने ग्रामपंचायतींपर्यंत आयोगाचा कार्यक्रम कसा पोहोचवायचा असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक