शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

ढगाळ हवामानामुळे द्राक्षपंढरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 9:14 PM

पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : घड जिरल्याने द्राक्षबागा जमीनदोस्त

पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे.गेल्या चार पाच दिवसापासून कधी थंडी कधी ऊन तर कधी ढगाळ रोगट हवामान असल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागांवर डावण्या सारख्या रोगाचा प्रार्दुभाव दिसू लागला असून घड जिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी द्राक्षबागांवर कुºहाड मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकरी सागर शिंदे यांनी एक एकर द्राक्ष बागेवर कुºहाड मारत द्राक्ष बाग जमीनदोस्त केली आहे.दुसºया टप्यातील छाटणीच्या द्राक्षबागा तयार झाल्या आहेत. त्यामुळे अश्या वातावरणात किंचितही बेमोसमी पाऊस झाला तर डावण्या, भुरी व पोग्यात असलेले घड जिरण्याची चिंता निर्माण झाली आहे दुपारी आर्द्रता व सकाळी धुके तर पावसाची रिप रिप अशा स्थितीमध्ये डावणी रोगाने धुमाकुळ घालायला सुरवात केली आहे.निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, आहेरगाव, मुखेड, बेहड, कारसूळ, लोनवाडी, दावचवाडी, अंतरवेली, पाचोरे, शिरवाडे वणी, उंबरखेड, नारायण टेंभी, पालखेड, रानवड, कसबे सुकेना, साकोरे, कोकणगाव या गावामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड झालेली आहे. सध्याच्या स्थितीत पोग्यात असलेल्या बागामध्ये मोठ्या प्रमाणात घड जिरण्याचे प्रमाण व डावणीच्या रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दररोजचे ढगाळ वातावरण व त्यात बेमोसमी पडणारा पाऊस त्यात सकाळी पडणारे दव यामुळे फवारणी करूनही दुसºया दिवशी रोग तसाच दिसतो.आमच्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाले. हे नुकसान कधीही न भरून येणारे आहे. झालेल्या नुकसानाला कंटाळून द्राक्ष बागेवर कुºहाड चालवावी लागली. परिणामी आतापर्यंत बागेवर केलेला लाखो रु पयांचा खर्च पाण्यात गेला आहे.- सागर शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत.बेमोसमी पावसामुळे द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण वाढले असल्याने द्राक्ष बागावर खर्च केलेले लाखो रु पये पाण्यात गेले आहे. प्रचंड नुकसान होऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याने प्रशासनाने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे आह.े- उद्धराजे शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी