शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बंद कारखाने, नवीन गुंतवणूक, कांदा निर्यातबंदीचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 1:31 AM

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही आणि कांदा निर्यातबंदीबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच चर्चेत मुद्दे उपस्थित करून कोंडी करण्यात आली.

ठळक मुद्देप्रचारातील मुद्दे : युतीकडून मात्र सरकारी योजना, ३७० कलमावरच भर

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही आणि कांदा निर्यातबंदीबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच चर्चेत मुद्दे उपस्थित करून कोंडी करण्यात आली.निवडणुका म्हटल्या की, जनसामन्यांचे प्रश्न चर्चेत येतात. प्रचाराच्या माध्यमातून त्यावर मंथन होत असते. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला जातो. यंदा प्रचारात विरोधी पक्षांनी याच मुद्द्यांना हात घातला. नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत एकही नवीन प्रकल्प आला नाही. मेक इन इंडिया, मेक इन नाशिक अशा अनेक घोेषणा झाल्या; परंतु उपयोग झाला नाही, उलट आर्थिक मंदीमुळे नाशिकचे अर्थकारण चालविणाºया बॉश, महिंद्रा आणि अन्य कारखान्यांवर संकट आले असून, त्यामुळे कामगार कपातीचे संकट घोंगावत आहे. त्याच मर्मावर विरोधकांनी बोट ठेवले. यााशिवाय शहरातील गावठाण क्लस्टर, पूररेषा रखडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यावरदेखील चर्चा अधिक झाली.ग्रामीण भागात सर्वाधिक मुद्दा कांदा निर्यातबंदीचाच चर्चेत ठरला. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण भागातील रोष बघता मुख्यमंत्र्यांनी प्रथमच ग्रामीण भागात दौरा करून निवडणुका झाल्या की, तत्काळ कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करू, असे सांगून रोष शमविण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेरपर्यंत हा मुद्दा विरोधकांच्या अजेंड्यावर होता. कळवण, चांदवड, देवळा या भागात नार-पारचे पाणीदेखील चर्चेत होते तर आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दादेखील चर्चेत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याबाबतदेखील रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे मात्र सरकार पक्षाची दमछाक झाली. त्यांनी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्तारूढ पक्षाच्या वतीने मात्र त्या तुलनेत सरकारी योजनांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यापेक्षा त्यांचा भर ३७० कलम, पाकिस्तानला धडा शिकविला, तिहेरी तलाक या मुद्द्यांवरच अधिक होता.दत्तक नाशिकवरून कोंडीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिक ा निवडणुकीच्या वेळी नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केले होते; मात्र त्यानंतर कोणतीही नवीन गुंतवणूक आली नाही. अनेक कारखाने बंद पडले हा मुद्दा विरोधकांनी पुढे केला असल्याने त्याची बरीच चर्चा झाली. नाशिक पश्चिम मतदारसंघात हा मुद्दा चर्चिला गेला; मात्र भाजपने माकपाच्या युनियनवर त्याबाबत ठपका ठेवून त्यामुळेच नवीन कारखाने आले नसल्याचे सांगून सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा अवघा एक किलोमीटरचा रस्ता, परंतु दोन वर्षांपासून तो रखडला असल्याने तोदेखील चर्चिला गेला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019onionकांदाElectionनिवडणूक