शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नाशिक शहरासाठी यंदा हवे पाचशे दलघफू अधिक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:47 IST

नाशिक : शहराची वाढती गरज लक्षात घेऊन आगामी आठ महिन्यांसाठी पाच हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण मिळावे यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, यंदा जलसंपदा विभागाचे नवीन निकष आणि कश्यपीतील अपुरा साठा आणि दारणातून पाणी उचलताना येणाऱ्या मर्यादा या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेला किती आरक्षण मिळते आणि ते कितपत पुरवले जाते याकडे आता लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचा प्रस्ताव : गंगापूर धरण समूहात पुरेसा साठा नसल्याने साशंकता

नाशिक : शहराची वाढती गरज लक्षात घेऊन आगामी आठ महिन्यांसाठी पाच हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण मिळावे यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, यंदा जलसंपदा विभागाचे नवीन निकष आणि कश्यपीतील अपुरा साठा आणि दारणातून पाणी उचलताना येणाऱ्या मर्यादा या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेला किती आरक्षण मिळते आणि ते कितपत पुरवले जाते याकडे आता लक्ष लागून आहे.महापालिकेला गंगापूर धरणाबरोबरच दारणा आणि मुकणे धरणातून पाणी पुरवले जाते. मात्र, दरवर्षी पाण्याचा वापर वाढत आहे. त्यामुळे महापालिका आणि जलसंपदा विभागात काहीसे शीतयुद्ध रंगत असते. दरवर्षी पाणी आरक्षणाच्या बैठकीत नाशिक महपाालिकेच्या पाणीवापरावर जोरदार चर्चा होते आणि पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, मुळातच नाशिक ही पर्यटन नगरी होत असल्याने चाळीस ते पन्नास हजार तरंगती लोकसंख्या असल्याने पाण्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे महापालिकेचे म्हणणे असते. गेल्यावर्षी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले होते. मात्र, पाच हजार २१४ दशलक्षघन फूट वापर झाला होता. यंदा नाशिक महापालिकेने १५ आॅक्टोबर ते ३१ जुलै २०२१ या कालावधीसाठी ५ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी आरक्षणाची मागणी केली आहे. गेल्यावर्षी महापालिकेला गंगापूर धरणातून ३६०० दशलक्ष घनफूट आरक्षण मिळाले होते. प्रत्यक्षात पाण्याचा वापर ३ हजार ६४९ इतका झाला. दारणा धरणातून चारशे दशलक्ष घनफूट आरक्षण मिळाले होते त्यात मल जल मिसळत असल्याने पावसाळ्याचे दोन महिने या पाण्याचा वापर करता आला नाही. त्यामुळे ३१९ दशलक्ष घनफूट इतकाच पाण्याचा वापर झाला तर मुकणे धरणातून एक हजार दशलक्षघन फूट आरक्षण मंजूर होते. प्रत्यक्षात १२४६ इतका वापर झाला आहे. त्यामुळे महापालिकेने यंदा सहाशे दशलक्ष घनफूट ज्यादा पाणी आरक्षण मागितले आहे.असे मागितले आरक्षण (दशलक्ष घनफूटमध्ये)एकूण- ५६००गंगापूर धरण समूह- ३८००दारणा- ४००मुकणे- १३००----------------गतवर्षीचा वापरएकूण मंजूर आरक्षण- ५०००गंगापूर- ३६००दारणा- ४००मुकणे- १०००----------------गंगापूर धरणाएवढे हवे आरक्षणनाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणाची क्षमता ७२०० दक्षलक्ष घनफूट इतकी होती. मात्र गाळ साचल्याने या धरणाची क्षमता ५६०० दशलक्ष घनफूट इतकी आहे. महापालिकेने यंदा ५६०० दशलक्ष घनफूट इतके पाणी आरक्षण मागितले असून, ते गंगापूर धरणाच्या साठवण क्षमतेइतके आहे.

 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी