शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By admin | Updated: May 19, 2017 00:18 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी आत्महत्या, कर्जमुक्ती, समृद्धी महामार्ग, तूर खरेदी यांसारख्या राज्याला भेडसाविणाऱ्या साऱ्या प्रश्नांना भारतीय जनता पक्ष व पर्यायाने या पक्षाचे मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा एकतर्फी निष्कर्ष काढून त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात यापूर्वीच उभ्या केलेल्या शिवसेनेने शुक्रवारच्या कृषी अधिवेशनात सरकार विरुद्ध आणखी मोठी घोषणा केली जाण्याची व्यक्त केलेल्या शक्यतेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांना अधिवेशनाची माहिती देताना भारतीय जनता पक्ष व राज्य सरकारवर प्रत्येक प्रश्नावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना नोटाबंदीदेखील कारणीभूत असल्याचे सांगून अप्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील टीकेचे लक्ष्य केले. तूर खरेदीच्या प्रश्नावर सरकार गोंधळेले असल्याचे तर समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा स्वप्नवत प्रकल्प असल्याने त्यात शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नसल्याचे सांगून शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभी राहील, अशी भूमिकाही या नेत्यांनी जाहीर करून टाकली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती न दिल्यास विधिमंडळ अधिवेशनावर लॉँगमार्च काढण्याचा इशाराही देऊन टाकण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना जे काही आगामी काळात करणार त्या त्या आंदोलनाची तसेच राज्यापुढील प्रश्नांना सरकारच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून भाजपावर विरोधी पक्षांनी करावी तशी टीका केलेली आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यापासूनच भाजपावर नाराज असल्याचे आजवर लपून राहिलेले नाही. मध्यंतरीच्या काळात टोकाची भूमिका घेऊन सेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे खिशात ठेवल्याचेही जाहीर करण्यात आले होते. कालापव्ययात या राजीनाम्याचे काय झाले हे कळू शकले नसले तरी, सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे त्यांच्या राज्यव्यापी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून दिसू लागले आहे. त्यामुळे कृषी अधिवेशनाची माहिती देताना सेना नेत्यांनी ज्या पद्धतीने साऱ्या गोष्टींना भाजपाच जबाबदार असल्याचे ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला ते पाहता उद्धव ठाकरे त्याहीपेक्षा पुढे जाऊन काही तरी मोठी घोषणा करतील याविषयी साशंकता नसली तरी, ती घोषणा काय असेल याविषयीची उत्सुकता लागून आहे. शिवसेनेने ताणली उत्सुकताकाही तरी महत्त्वाची भूमिका शिवसेना या अधिवेशनात घेणार असून, त्याची मोठी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच करणार असल्याचे सांगून सेना नेत्यांनी साऱ्यांचीच उत्सुकता ताणून धरली आहे.