शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

मन:स्थिती बदला; परिस्थिती बदलेल उज्ज्वल निकम : ‘खान्देश रत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्यात मांडले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:38 IST

नाशिक : आपल्या आयुष्यात आत्मविश्वासाला महत्त्व आहे. आत्मविश्वास संघर्ष देण्याची प्रेरणा देतो त्यासाठी मन:स्थिती बदलणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देखान्देश महोत्सवाची रविवारी सांगताकाय संस्कार करू हा विचार क्रमप्राप्त

नाशिक : आपल्या आयुष्यात आत्मविश्वासाला महत्त्व आहे. आत्मविश्वास संघर्ष देण्याची प्रेरणा देतो त्यासाठी मन:स्थिती बदलणे आवश्यक आहे. ती बदलल्यास परिस्थिती आपोआप बदलते, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी रविवारी (दि. ३१) ‘खान्देश रत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले.सिडको, लवाटेनगर येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या खान्देश महोत्सवाची रविवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी कर्मभूमी आणि जन्मभूमीने खान्देशी असलेल्या नागरिकांचा ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, मविप्र अध्यक्ष डॉ, सुरेश शेवाळे, लोकमत नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक किरण अग्रवाल, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश गायधनी, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील आदी उपस्थित होते. यावेळी संवाद साधताना अ‍ॅड. निकम यांनी भाषेबद्दल फाजील अभिमान नसावा, असे सांगताना आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि देशाच्या प्रबळ लोकशाहीत देशात एकोपा टिकून राहणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात सगळ्यांना ‘व्हॉट्स अ‍ॅप’ नावाचा रोग जडला असून, यापासून दूर जाणे आवश्यक आहे. आजची पिढी शिक्षित होणे आवश्यक असताना पालक दररोज दूरचित्रवाणीवर रटाळ मालिका पाहत बसतात हे चित्र बदलायला हवे, असे न झाल्यास पाल्यांवर आपण काय संस्कार करू हा विचार करणे क्रमप्राप्त आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करत चांगले काम करणे आवश्यक आहे. वाढत्या गुन्हेगारीबाबत बोलताना निकम यांनी गुन्हेगाराला कुठलीही जात किंवा पंथ नसतो, परंतु हल्ली गुन्हेगाराची जात हमखास बघितली जाते आणि याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज पाठविले जातात, हे चित्र थांबणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते आर्कि टेक्ट संजय पाटील, कलाकार कांचन पगार, राजेश कोठावदे, स्वाती पाचपांडे, सुरेश पवार, नंदलाल जगताप, डॉ. रावसाहेब पाटील, प्रमोद कोतवाल, रवींद्र पाटील, गीता माळी, डॉ. विजया पाटील यांना ‘खान्देश रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार सीमा हिरे यांनी खान्देश महोत्सवाच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगताना हा महोत्सव केवळ खान्देश पुरता मर्यादित न राहता तो नाशिककरांनीही आपलासा केला असल्याचे सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त स्वाती पाचपांडे आणि राजेश कोठावदे तसेच मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेठकर आणि रवींद्र मालुंजकर, तर आभार रश्मी हिरे बेंडाळे यांनी मानले.प्रादेशिक समरसतेचा पायंडाखान्देशातील गिरणा आणि तापी नदी काठच्या संस्कृतीचा नाशिकच्या गोदेशी संगम घडवून प्रादेशिक समरसतेचे अभिसरण घडविण्याचा पायंडा खान्देश महोत्सवातून पाडला गेला तो कौतुकास्पद असल्याचे लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी सांगितले.