शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

अवकाश संशोधन कार्यासाठी ‘चांद्रयान-२’ मोहीम उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:31 AM

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लॅँडर या उपग्रहाचा इस्त्रो संस्थेशी पुरेसा संपर्क होऊ शकला नाही, तरीही या उपग्रहाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या उपग्रहावरून विविध छायाचित्रेदेखील आतापर्यंत मिळाली असून, त्याचा वेगवेगळ्या संशोधन कार्यासाठी उपयोग होऊ शकतो.

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लॅँडर या उपग्रहाचा इस्त्रो संस्थेशी पुरेसा संपर्क होऊ शकला नाही, तरीही या उपग्रहाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या उपग्रहावरून विविध छायाचित्रेदेखील आतापर्यंत मिळाली असून, त्याचा वेगवेगळ्या संशोधन कार्यासाठी उपयोग होऊ शकतो. विशेषत: या उपग्रहावर लावलेल्या कॅमेऱ्याने हवी तशी छायाचित्रे पाठविण्यास विक्रम लॅण्डर आॅरफीट यशस्वी झालेले दिसते. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर उपग्रम मोहीम आखणारा भारत हा जगातील पहिलाच देश असून, या ठिकाणी असलेली माती, खडक, हवामान यांचा अभ्यास यातून होणार आहे. इस्त्रोची ही मोहीम सुमारे ९0 टक्के यशस्वी झाली, असे मत जगभरातील शास्त्राज्ञांनी व्यक्त केले आहे. विक्रम लॅँडर या उपग्रहाचे कार्य आणखी सुमारे सात वर्ष सुरू राहणार असून, त्याचा कार्य कालावधी वाढविण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. या मोहिमेतून संशोधनासाठी तसेच शास्त्रज्ञांना अभ्यास करण्यासाठी चांगली माहिती मिळत असल्याने अमेरिकेतील नासा आणि युरोपातील अन्य अवकाश संशोधन संस्थांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे. भारतातील शास्त्रज्ञांचे आणि इस्त्रोचे देशभरातील शास्त्रज्ञांनी अभिनंदन केले असून, हा चांगला प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. सदर उपग्रह हा पूर्वीच्या नियोजनानुसार दि. ७ सप्टेंबरला चंद्रावर उतरणे अपेक्षित होते, परंतु तांत्रिक कारणांनी ते शक्य झाले नाही. तरी याला अपयश म्हणता येणार नाही. नासाने पुढील काळात म्हणजे इ. स. २0१४ मध्ये अर्टेमीस मिशन ही मोहीम आखली आहे. यात मन मिशन ही मोहीम असल्याने सध्या छायाचित्राचा उपयोग होणार आहे, असेही नासाने म्हटले आहे. इस्त्रोने मिशन चांद्रयान- २ या मोहिमेनंतर आता चंद्रयान- ३ ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. दि. २१ सप्टेंबरपासून हा उपग्रह काळोखात जाणार आहे. साधारणत: १४ दिवसांचा हा कालावधी असणार आहे. त्यानंतर पुन्हा या उपग्रहावरून वेगवेगळी छायाचित्रे मिळू शकतील. चंद्राच्या जवळ अनुकूल वातावरण नसल्याने उपग्रहाचे लॅँडिंग होऊ शकले नाही. ही मोहीम १00 टक्के यशस्वी होऊ शकली नाही, याबद्दल शास्त्रज्ञ डॉ. सिवेन यांच्यासह सर्वच भारतीय जनता भावनिक झाली होती. परंतु आतापर्यंत चांद्रयानची कोणतीही मोहीम ४0 टक्केपेक्षा जास्त यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे भारताची मोहीम त्यामानाने खूपच यशस्वी ठरली आहे. आगामी काळात चंद्रावर पाणी, बर्फ आणि अन्य गोष्टींच्या संशोधनासाठी ही मोहीम यशस्वी ठरणारी आहे. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Nashikनाशिक