शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नवनियुक्त ‘मानद वन्यजीव रक्षकां' पुढे मानव-बिबट्या संघर्षाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:21 IST

जिल्ह्यातील प्रामुख्याने निफाड, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत बिबट्याकडून मानव हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. हा संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाऊन प्रभावी जनजागृती करण्यावर या दोघांना भर द्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला लाभले दोन वन्यजीव रक्षकतीन वर्षांकरिता नियुक्ती सतत रहावे लागणार ‘ॲलर्ट’

नाशिक : जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये मानव-बिबटे संघर्ष उभा राहताना दिसून येत आहे. हा संघर्ष थोपविण्यासाठी जनसामान्यांमध्ये बिबट्यासोबतचे सहजीवन, संवर्धनाविषयी जनजागृती करण्याची गरज असून जिल्ह्याला नव्याने लाभलेल्या मानद वन्यजीव रक्षकांपुढे हे मोठे आव्हान असणार आहे.

राज्य शासनाने वनविभागाकडून छाननी अंतिम प्राप्त झालेल्या मानद वन्यजीव रक्षकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून राज्यभरातील एकूण २६ जिल्ह्यांचे मिळून सुमारे ४८ वन्यजीव प्रेमींचे मागील वन्यजीव संवर्धन व जनजागृती, प्रबोधनपर कार्य लक्षात घेऊन ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून पुढील तीन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याला दोन मानद वन्यजीव रक्षक मिळाले असून यामध्ये सिडको येथील युवा वन्यजीवप्रेमी वैभव प्रकाश भोगले व मालेगावचे अमित सुभाष खरे यांचा समावेश आहे. भोगले यांच्या रुपाने जिल्ह्याला युवा मानद वन्यजीव रक्षक मिळाला आहे. ते मागील सहा ते सात वर्षांपासून नाशिक वनविभागासोबत वन्यजीव संवर्धनासह पर्यावरण जनजागृतीचे काम करत आहे. रस्ते अपघातात वन्यजीवांचा जाणारा बळी रोखण्यासाठी भोगले यांनी त्यांच्या संस्थेमार्फत विविध रस्त्यांवर सूचना फलकही उभारले आहेत. तसेच अपघातात जखमी बिबटे, कोल्हे, गिधाड, काळविटांसह दुर्मीळ सर्पांनाही रेस्क्यू करत त्यांच्या शुश्रूषेसाठी भोगले अग्रेसर राहत असल्याने त्यांचा प्रस्ताव मंजूर करत शासनाने त्यांची निवड केली आहे. तसेच खरे हे यापूर्वीही या पदावर कार्यरत होते, त्यांची पुन्हा नियुक्ती करुन शासनाने त्यांना तिसऱ्यांदा वन्यजीव संवर्धन करण्याची संधी दिली आहे. भोगले व खरे यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांचा राहणार आहे.

- वैभव प्रकाश भोगले

अमित सुभाष खरे

जिल्ह्यातील प्रामुख्याने निफाड, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत बिबट्याकडून मानव हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. हा संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाऊन प्रभावी जनजागृती करण्यावर या दोघांना भर द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे छुप्या पध्दतीने जिल्ह्यात मांडूळसारखे सर्प, गोड्या पाण्यातील कासव आदींची होणारी तस्करी तर घुबडासारख्या पक्ष्यांचा अंधश्रध्देपोटी जाणारा बळी रोखण्यासाठीही सतर्क राहून वनविभागाला वेळोवेळी माहिती देऊन कारवाईसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीवforestजंगलNashikनाशिकleopardबिबट्या