शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

नवनियुक्त ‘मानद वन्यजीव रक्षकां' पुढे मानव-बिबट्या संघर्षाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:21 IST

जिल्ह्यातील प्रामुख्याने निफाड, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत बिबट्याकडून मानव हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. हा संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाऊन प्रभावी जनजागृती करण्यावर या दोघांना भर द्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला लाभले दोन वन्यजीव रक्षकतीन वर्षांकरिता नियुक्ती सतत रहावे लागणार ‘ॲलर्ट’

नाशिक : जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये मानव-बिबटे संघर्ष उभा राहताना दिसून येत आहे. हा संघर्ष थोपविण्यासाठी जनसामान्यांमध्ये बिबट्यासोबतचे सहजीवन, संवर्धनाविषयी जनजागृती करण्याची गरज असून जिल्ह्याला नव्याने लाभलेल्या मानद वन्यजीव रक्षकांपुढे हे मोठे आव्हान असणार आहे.

राज्य शासनाने वनविभागाकडून छाननी अंतिम प्राप्त झालेल्या मानद वन्यजीव रक्षकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून राज्यभरातील एकूण २६ जिल्ह्यांचे मिळून सुमारे ४८ वन्यजीव प्रेमींचे मागील वन्यजीव संवर्धन व जनजागृती, प्रबोधनपर कार्य लक्षात घेऊन ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून पुढील तीन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याला दोन मानद वन्यजीव रक्षक मिळाले असून यामध्ये सिडको येथील युवा वन्यजीवप्रेमी वैभव प्रकाश भोगले व मालेगावचे अमित सुभाष खरे यांचा समावेश आहे. भोगले यांच्या रुपाने जिल्ह्याला युवा मानद वन्यजीव रक्षक मिळाला आहे. ते मागील सहा ते सात वर्षांपासून नाशिक वनविभागासोबत वन्यजीव संवर्धनासह पर्यावरण जनजागृतीचे काम करत आहे. रस्ते अपघातात वन्यजीवांचा जाणारा बळी रोखण्यासाठी भोगले यांनी त्यांच्या संस्थेमार्फत विविध रस्त्यांवर सूचना फलकही उभारले आहेत. तसेच अपघातात जखमी बिबटे, कोल्हे, गिधाड, काळविटांसह दुर्मीळ सर्पांनाही रेस्क्यू करत त्यांच्या शुश्रूषेसाठी भोगले अग्रेसर राहत असल्याने त्यांचा प्रस्ताव मंजूर करत शासनाने त्यांची निवड केली आहे. तसेच खरे हे यापूर्वीही या पदावर कार्यरत होते, त्यांची पुन्हा नियुक्ती करुन शासनाने त्यांना तिसऱ्यांदा वन्यजीव संवर्धन करण्याची संधी दिली आहे. भोगले व खरे यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांचा राहणार आहे.

- वैभव प्रकाश भोगले

अमित सुभाष खरे

जिल्ह्यातील प्रामुख्याने निफाड, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत बिबट्याकडून मानव हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. हा संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाऊन प्रभावी जनजागृती करण्यावर या दोघांना भर द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे छुप्या पध्दतीने जिल्ह्यात मांडूळसारखे सर्प, गोड्या पाण्यातील कासव आदींची होणारी तस्करी तर घुबडासारख्या पक्ष्यांचा अंधश्रध्देपोटी जाणारा बळी रोखण्यासाठीही सतर्क राहून वनविभागाला वेळोवेळी माहिती देऊन कारवाईसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीवforestजंगलNashikनाशिकleopardबिबट्या