शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

सावधान : चायनिज अगरबत्ती पेटवाल तर श्वसनाच्या आजाराला द्याल निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:28 IST

मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देचायनिज अगरबत्तींच्या धुराचा ठसका अगरबत्तीची लांबी सामान्य अगरबत्तीच्या तुलनेत कितीतरीपटीने अधिक

अझहर शेख, नाशिक : कोणतीही पूजाविधी असो अथवा धार्मिक कार्य. त्यावेळी घरातील तसेच मंदिरातील वातावरण भक्तीमय करण्यासाठी अगरबत्ती जाळण्याची परंपरा मागील अनेक वर्ष जुनी आहेत. सुवासिक अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरण भक्तीमय होण्यास मदत होते; मात्र यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आलेल्या चायनिज अगरबत्तींच्या धुराचा ठसका उद्भवू शकतो. ही अगरबत्ती आरोग्यासाठी घातक ठरणारी असल्याचे बोलले जात आहे.‘श्रीं’चा उत्सव अर्थात गणेशोत्सवाला गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वूभमीवर गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. अबालवृध्दांकडून गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वातावरण भक्तीमय करण्यासाठी फुले, धूप, अत्तर, अगरबत्तीचा वापर नागरिकांकडून केला जातो. मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या अगरबत्तीची भुरळ सर्वसामन्यांना पडणे स्वभाविक आहे. कारण अगरबत्तीची लांबी सामान्य भारतीय अगरबत्तीच्या तुलनेत कितीतरीपटीने अधिक आहे. ही अगरबत्ती सुमारे पंधरा तासांपेक्षा अधिक वेळ जळते. तसेच या अगरबत्तीचे दरदेखील कमी आहे. त्यामुळे नागरिकांकडून या अगरबत्तीला पसंती दिली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चायनिज अगरबत्ती स्वस्त जरी असली तरी ती आरोग्यासाठी ‘महाग’ ठरु शकते. या अगरबत्तीचा धुराद्वारे येणारा सुगंध जीव गुदमरायला लावणारा असल्याचे काही भाविक सांगतात. शहरातील डॉक्टरांनीदेखील अगरबत्तीच्या धुरामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता वर्तविली आहे. आरोग्यहित लक्षात घेता या अगरबत्त्यांचा मोह आवरणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

अगरबत्तीच्या धुरामुळे निश्चित श्वसनतंत्रावर परिणाम होऊ शकतो. सुरूवातीला गिळायला त्रास होणे, आवाज घोगरा होणे अशी लक्षणे दिसतात.शरीराला धूर नकोसा वाटतो आणि जीव गुदमरायला लागतो तेव्हा मनुष्य त्या वातावरणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. कारण श्वसननलिकांमार्फत धूर थेट फुफ्फुसात जात असतो. यामुळे लहान श्वसननलिका आंकु चन पावतात. परिणामी प्राणवायूचा शरीराला पुरवठा कमी होऊ लागतो. यामुळे दीर्घकाळ आरोग्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. नागरिकांनी अगरबत्ती खरेदी करताना खबरदावी व सावधगिरी बाळगावी.- डॉ. प्रिती त्रिवेदी, एम डी. आयुर्वेद

टॅग्स :Healthआरोग्यGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Nashikनाशिक