शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सावधान : चायनिज अगरबत्ती पेटवाल तर श्वसनाच्या आजाराला द्याल निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:28 IST

मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देचायनिज अगरबत्तींच्या धुराचा ठसका अगरबत्तीची लांबी सामान्य अगरबत्तीच्या तुलनेत कितीतरीपटीने अधिक

अझहर शेख, नाशिक : कोणतीही पूजाविधी असो अथवा धार्मिक कार्य. त्यावेळी घरातील तसेच मंदिरातील वातावरण भक्तीमय करण्यासाठी अगरबत्ती जाळण्याची परंपरा मागील अनेक वर्ष जुनी आहेत. सुवासिक अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरण भक्तीमय होण्यास मदत होते; मात्र यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आलेल्या चायनिज अगरबत्तींच्या धुराचा ठसका उद्भवू शकतो. ही अगरबत्ती आरोग्यासाठी घातक ठरणारी असल्याचे बोलले जात आहे.‘श्रीं’चा उत्सव अर्थात गणेशोत्सवाला गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वूभमीवर गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. अबालवृध्दांकडून गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वातावरण भक्तीमय करण्यासाठी फुले, धूप, अत्तर, अगरबत्तीचा वापर नागरिकांकडून केला जातो. मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या अगरबत्तीची भुरळ सर्वसामन्यांना पडणे स्वभाविक आहे. कारण अगरबत्तीची लांबी सामान्य भारतीय अगरबत्तीच्या तुलनेत कितीतरीपटीने अधिक आहे. ही अगरबत्ती सुमारे पंधरा तासांपेक्षा अधिक वेळ जळते. तसेच या अगरबत्तीचे दरदेखील कमी आहे. त्यामुळे नागरिकांकडून या अगरबत्तीला पसंती दिली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चायनिज अगरबत्ती स्वस्त जरी असली तरी ती आरोग्यासाठी ‘महाग’ ठरु शकते. या अगरबत्तीचा धुराद्वारे येणारा सुगंध जीव गुदमरायला लावणारा असल्याचे काही भाविक सांगतात. शहरातील डॉक्टरांनीदेखील अगरबत्तीच्या धुरामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता वर्तविली आहे. आरोग्यहित लक्षात घेता या अगरबत्त्यांचा मोह आवरणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

अगरबत्तीच्या धुरामुळे निश्चित श्वसनतंत्रावर परिणाम होऊ शकतो. सुरूवातीला गिळायला त्रास होणे, आवाज घोगरा होणे अशी लक्षणे दिसतात.शरीराला धूर नकोसा वाटतो आणि जीव गुदमरायला लागतो तेव्हा मनुष्य त्या वातावरणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. कारण श्वसननलिकांमार्फत धूर थेट फुफ्फुसात जात असतो. यामुळे लहान श्वसननलिका आंकु चन पावतात. परिणामी प्राणवायूचा शरीराला पुरवठा कमी होऊ लागतो. यामुळे दीर्घकाळ आरोग्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. नागरिकांनी अगरबत्ती खरेदी करताना खबरदावी व सावधगिरी बाळगावी.- डॉ. प्रिती त्रिवेदी, एम डी. आयुर्वेद

टॅग्स :Healthआरोग्यGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Nashikनाशिक