शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

भारतरत्नचा मुद्दा भाजपने पळविला

By संजय पाठक | Published: October 18, 2019 1:59 AM

ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला होता; मात्र विधानसभेच्या जाहीरनाम्यात तो भाजपने पळविला आहे.

ठळक मुद्देआधी होती शिवसेनेची मागणी : हिंदुत्ववाद्यांना चुचकारण्याचे प्रयत्न

नाशिक : ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला होता; मात्र विधानसभेच्या जाहीरनाम्यात तो भाजपने पळविला आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान अतुलनीय आहे; मात्र त्यांना सतत वादात ढकलण्याचे प्रयत्न राजकारण्यांनी केल्याची भावना सावरकरप्रेमींमध्ये आहे. अंदमानच्या जेलमधून सुटकेसाठीचा माफीनामा आणि अन्य कारणांवरून सावरकरांना वादात ठेवून त्यांच्या अन्य कार्याकडे आणि प्रतिभेकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याचीदेखील भावना व्यक्त केली जाते.सावरकर हे क्रांतिकारकच नव्हे तर ते भाषातज्ज्ञ, कवी होते. शिवाय जातिअंत चळवळीचे त्यांचे कार्यदेखील महत्त्वाचे होते, असे समर्थक मानतात; परंतु त्यानंतरदेखील त्यांचा यथोचित राष्टÑपुरुष म्हणून गौरव होत नसल्याची खंतदेखील व्यक्त केली जाते. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी हिंदुत्ववादी म्हणून त्यांना कायम मानाचे स्थान दिले असले तरी त्यांच्याकडूनदेखील सावरकरांची प्रतिमा उजागर करण्यासाठी फार प्रयत्न केले जात नसल्याची खंत बोलून दाखविली जात होती. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा उचलला आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जवळपास सर्वच सभांमध्ये त्याचा उल्लेख करताना सावरकर यांना भारतरत्न मिळविण्यासाठी पाठपुरावा करू, असेही जाहीर केले; परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र भाजपानेच हा मुद्दा पळवून आपल्या जाहीरनाम्यात घातला आहे.क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनाही भारतरत्न देण्याचा प्रयत्न करू, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी सुखावले असले तरी वारंवार होणारी मागणी पूर्ण होणार काय याबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे.नाशिकमधूनही प्रयत्नस्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी नाशिकच्या शिवसैनिक असलेल्या अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी यांनी एक लाख नागरिकांच्या सह्या घेऊन पंतप्रधानांना निवेदन पाठविण्याचा संकल्प केला असला तरी दुर्दैवाने त्यांच्या अपघाती निधनानंतर संकल्प अर्धवट राहिला.४सावरकरांच्या भगूर येथील वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. अभिनव भारत संस्थेच्या कार्यालयाचेदेखील संवर्धन केले जात आहे. शिवाजी उद्यानाचे उद्घाटनही सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा