शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आमचा मुख्य शत्रू"; नाना पटोलेंचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 15:57 IST

इगतपुरी : आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्यानुसार आमची भूमिका राहणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्तेची ...

इगतपुरी : आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्यानुसार आमची भूमिका राहणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्तेची सूत्र काँग्रेसकडेच राहतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिर सांगताप्रसंगी सांगितले. दरम्यान, पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली व गावगुंडांना गावगुंडच दिसणार असल्याचा टोला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

इगतपुरीत रेन फॉरेस्ट रिसोर्ट येथे मुंबई प्रदेश काँग्रेसच्यावतीने आयोजित तीनदिवसीय प्रशिक्षण शिबिराची सांगता रविवारी (दि. २३) झाली. यावेळी नाना पटोले यांनी मार्गदर्शन करत पक्षाची भूमिका विषद केली. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले, मोदी सरकारने जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारल्याने देशात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. महागाईमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले असून, केंद्रातील सरकार सपशेल फेल झाले आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल.

भाजप व शिवसेनेची गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता राहिली आहे. मात्र, आगामी निवडणुकीत भाजप हाच आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्या पद्धतीने आम्ही भूमिका ठरवू. महाराष्ट्राची ओळख ही बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली आहे. म्हणून मी त्यांच्या प्रत्येक जयंतीदिनी अभिवादन करतो. राजकारण हे परिवर्तनवादी असते, बाळासाहेबांना धोकेबाज लोक कधीच आवडत नव्हते आणि ज्यांनी त्यांच्याशी धोका केला ते त्यांना जवळही उभे करत नव्हते. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आमदार हिरामण खोसकर, संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहांगे आदी उपस्थित होते.

...तर शेतकऱ्यांची वीजजोडणी चालू ठेवू

ऊर्जामंत्री नितीन राऊत हे शेतकऱ्याची वीज कापल्याशिवाय पर्याय नाही, असे बोलले असता यावर भाजपने टीका केली. मात्र, २०१७पासून भाजपने केलेले पाप आमच्या शेतकऱ्यांच्या उरावर आहे. भाजपच्या काळात जे नुकसान झाले त्याचे परिणाम शेतकरी भोगतोय. मात्र, विधानसभेत याविषयी चर्चा झाली असून, फक्त चालू बिले भरली तरी शेतकऱ्यांचे कनेक्शन कायम चालू ठेवण्याचा निर्णय झाला असल्याची माहितीही पटोले यांनी दिली.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण