शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जिल्हा परिषदेची भोयेगाव शाळा देते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:10 IST

विविध शिक्षण मंडळे व माध्यमाच्या शाळांतील स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा उंचावल्या असताना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. ही नाशिक जिल्ह्यातील सर्व उपक्रमशील शाळा व शिक्षकांना अभिमानास्पद बाब ठरली आहे.

ठळक मुद्देव्यावसायिक शिक्षणावर भर : कौशल्यपूर्ण दर्जेदार शैक्षणिक वातावरण;  अ‍ॅपद्वारे स्पर्धा परीक्षा सराव

नामदेव भोरनाशिक : विविध शिक्षण मंडळे व माध्यमाच्या शाळांतील स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा उंचावल्या असताना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. ही नाशिक जिल्ह्यातील सर्व उपक्रमशील शाळा व शिक्षकांना अभिमानास्पद बाब ठरली आहे.भोयेगाव येथील शाळेचे शिक्षकही आंतरराष्ट्रीय मंडळाच्या गुणवत्ता कक्षेच्या तज्ज्ञांच्यानिवडप्रक्रियेत गुणवत्ता सिद्ध करून विविध चाचण्या यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन निवडले गेले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम अध्ययनावरही दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही अपेक्षापूर्ती होत आहे. इंटरनेटच्या मदतीने व्हिडीओ, पावर पॉइंट प्रेझेंटेशन, वर्ड फाइल डाउनलोड करून व स्वत: तयार करून अध्यापन केले जात असल्याने रोज काहीतरी नवीन अध्ययानाचा अनुभव मिळणार या उत्सुकतेने विद्यार्थी शाळेत येतात. शाळेत वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले असून, विद्यार्थी शिक्षकांच्या मदतनीने अ‍ॅपही तयार करतात. संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषेतून संवाद कार्यशाळा, दप्तरमुक्त शनिवार, कुतुहल कोपरा, क्युआर कोडनिर्मिती अशा उपक्रमांसह कांदा लागवड, वेल्डिंग दुकान, नर्सरी यात्रा, गड-किल्ले परिसर व व्यावसाय भेटीतून विद्यार्थ्यांना येथे सर्वांगीन शिक्षण मिळत आहे.पालकांकडून मदतीचा हातलोकसहभागातून शाळेच्या प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर बसवून अतिशय प्रभावीपणे वापर सुरू आहे. इंटरनेट, व्हिडिओ, पीपीटी वर्ड फाइलद्वारे अध्यापन प्रक्रिया सुरू आहे.भोयेगाव शिशुगट पॅटर्नभोयेगाव शाळेत शिशुगटापासूनच विद्यार्थी तयार होतात. स्पर्धा परीक्षेत आवड वाढविण्यासाठी एक हजार प्रश्नसंच असलेले ‘चिमुकले बालक‘ नावाचे अ‍ॅप बनवले आहे. विद्यार्थी, पालक त्याचा उपयोग करतात.शालेय विद्यार्थ्यांसाठी गणिताचे वास्तव आणि रोजच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करण्यासाठी सीबीएसईने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या आर्यभट्ट परीक्षेत भोयेगाव शाळेतील १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.गटकार्य, गटचर्चा याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अधिकचा आत्मविश्वास निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या वैचारिक पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. विद्यार्थी व शिक्षक दोघेही शिक्षणाचा आनंद घेत आहेत- निवृत्ती अहेर, मुख्याध्यापक

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण