शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जिल्हा परिषदेची भोयेगाव शाळा देते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:10 IST

विविध शिक्षण मंडळे व माध्यमाच्या शाळांतील स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा उंचावल्या असताना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. ही नाशिक जिल्ह्यातील सर्व उपक्रमशील शाळा व शिक्षकांना अभिमानास्पद बाब ठरली आहे.

ठळक मुद्देव्यावसायिक शिक्षणावर भर : कौशल्यपूर्ण दर्जेदार शैक्षणिक वातावरण;  अ‍ॅपद्वारे स्पर्धा परीक्षा सराव

नामदेव भोरनाशिक : विविध शिक्षण मंडळे व माध्यमाच्या शाळांतील स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा उंचावल्या असताना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. ही नाशिक जिल्ह्यातील सर्व उपक्रमशील शाळा व शिक्षकांना अभिमानास्पद बाब ठरली आहे.भोयेगाव येथील शाळेचे शिक्षकही आंतरराष्ट्रीय मंडळाच्या गुणवत्ता कक्षेच्या तज्ज्ञांच्यानिवडप्रक्रियेत गुणवत्ता सिद्ध करून विविध चाचण्या यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन निवडले गेले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम अध्ययनावरही दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही अपेक्षापूर्ती होत आहे. इंटरनेटच्या मदतीने व्हिडीओ, पावर पॉइंट प्रेझेंटेशन, वर्ड फाइल डाउनलोड करून व स्वत: तयार करून अध्यापन केले जात असल्याने रोज काहीतरी नवीन अध्ययानाचा अनुभव मिळणार या उत्सुकतेने विद्यार्थी शाळेत येतात. शाळेत वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले असून, विद्यार्थी शिक्षकांच्या मदतनीने अ‍ॅपही तयार करतात. संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषेतून संवाद कार्यशाळा, दप्तरमुक्त शनिवार, कुतुहल कोपरा, क्युआर कोडनिर्मिती अशा उपक्रमांसह कांदा लागवड, वेल्डिंग दुकान, नर्सरी यात्रा, गड-किल्ले परिसर व व्यावसाय भेटीतून विद्यार्थ्यांना येथे सर्वांगीन शिक्षण मिळत आहे.पालकांकडून मदतीचा हातलोकसहभागातून शाळेच्या प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर बसवून अतिशय प्रभावीपणे वापर सुरू आहे. इंटरनेट, व्हिडिओ, पीपीटी वर्ड फाइलद्वारे अध्यापन प्रक्रिया सुरू आहे.भोयेगाव शिशुगट पॅटर्नभोयेगाव शाळेत शिशुगटापासूनच विद्यार्थी तयार होतात. स्पर्धा परीक्षेत आवड वाढविण्यासाठी एक हजार प्रश्नसंच असलेले ‘चिमुकले बालक‘ नावाचे अ‍ॅप बनवले आहे. विद्यार्थी, पालक त्याचा उपयोग करतात.शालेय विद्यार्थ्यांसाठी गणिताचे वास्तव आणि रोजच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करण्यासाठी सीबीएसईने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या आर्यभट्ट परीक्षेत भोयेगाव शाळेतील १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.गटकार्य, गटचर्चा याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अधिकचा आत्मविश्वास निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या वैचारिक पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. विद्यार्थी व शिक्षक दोघेही शिक्षणाचा आनंद घेत आहेत- निवृत्ती अहेर, मुख्याध्यापक

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण