शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

भोजापूर धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:30 PM

नांदूरशिंगोटे - सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. परिसरासाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला असून मृत पाणी साठ्यावर पाणी पुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहेत.

नांदूरशिंगोटे - सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. परिसरासाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला असून मृत पाणी साठ्यावर पाणी पुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहेत. पाच धरणांपैकी भोजापूर धरण सर्वात मोठे धरण आहे. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील काही गावे धरणाच्या लाभक्षेत्रात असून भोजापूर धरणावरच परिसरातील पाणी पुरवठा योजना व शेती व्यवसाय अवलंबून आहे. म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरण बांधण्यात आले असून ३६१ दशलक्ष घनफूट क्षमता असुन १०७ दशलक्ष घनफूट निरूपयोगी साठा आहे. गत महिन्यापासून तीव्र उन्हामुळे धरणातील पिण्याचे वेगाने बाष्पीभवन तसेच धरणातून राजरोसपणे होणारा अवैध पाणी उपसा यामुळे धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे.यावर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरून सुध्दा मागील वर्षी पेक्षा पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने मे मिहन्याच्या अखेरीस धरण कोरडे पडण्याची शक्यता आहे.भोजापूर धरण गतवर्षी पुर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत होते. पूरपाण्याचा लाभक्षेत्रातील गावांना फायदा झाला होता. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील सुमारे २१ गावातील १०० च्या आसपास लहान मोठे केटीवेअर बंधारे भरण्यात आले होते. तब्बल अडीच मिहने पूरपाणी कालव्याद्वारे सुरु होते. पुर्व भागातील पांगरी परिसरात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे अनेक वर्षानतंर पाणी पोहचले होते. भोजापूर धरणाच्या पाण्यावर कणकोरी सह पाचगावे व मनेगाव सह सोळागावे नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. आजमतिीला धरणातील उपयुक्त पाण्यासाठ्या पैकी फक्त दोन दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहेत. धरणातील मृत पाणी साठ्यावर आगामी काळात पाणी पुरवठा योजना तग धरून राहतील अशी परिस्थिती आहे. धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाण्याला पिवळसर रंग येतो. त्यामुळे पाणी बेचव लागते.भविष्य काळात पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भोजापूर धरणात उपयुक्त पाणी साठा संपत आला असुन मृतपाणी साठ्यावर नळपाणी योजना सुरू राहतील व सुमारे दोन महिने पाणी पुरवठा सुरू राहू शकतो.------------------गाळाची समस्या बनली गंभीरभोजापूर धरणाच्या पाण्यावरच परिसराचे भवितव्य अवलंबून आहे.भोजापूर धरण उभारणीपासून आजपर्यंत गाळ उपसण्यात आला नाही तसेच धरणाच्या अनेक भागात टेकड्या असल्याने पाण्याची जागा गाळाने व्यापली आहे. त्याचा परिणाम पाणी पातळीवर झाला आहे.गाळाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातील पाणी नदी द्वारे वाहून जाते.धरणातील गाळ काढल्यास पाण्याची पातळी वाढेल आण ित्याचा फायदा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना होईल. 

टॅग्स :Nashikनाशिक