शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

नांदगाव तहसीलवर बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:43 AM

नांदगाव तालुक्यात अवघा वीस टक्के पाऊस झाल्याने पाणी, चारा, कर्ज आदी उपाययोजना करण्याची मागणी करीत शेतकºयांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.

ठळक मुद्देतालुक्यात वीस टक्के पाऊस : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नांदगाव : तालुक्यात अवघा वीस टक्के पाऊस झाल्याने पाणी, चारा, कर्ज आदी उपाययोजना करण्याची मागणी करीत शेतकºयांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. शंंभरहून अधिक बैलगाड्यांपैकी अवघ्या पाचच बैलगाड्या कार्यालयाच्या आवारात आणण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला होता.यंदा वीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने दहा टक्के पेरण्यादेखील धड होऊ शकलेल्या नाहीत. जिल्ह्यातील सर्वात मोठी भीषणता निर्माण झालेल्या तालुक्यात दिलासा देणारी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचा आरोप मोर्चेकरी शेतकºयांनी केला. पाचच बैलगाड्या पाठवा अथवा पाच जणांचे शिष्टमंडळ घेऊन या अशी भूमिका स्वीकारणाºया प्रशासनाने नंतर नमते घेत संतप्त शेतकºयांचे निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मंगळवारी सकाळी शासकीय विश्रागृहाला बैलगाड्यांच्या तळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तळवाडे, साकोरा, मूळ डोंगरी , जामदरी, नवे पांझण, हिंगणवाडी आदी पंचक्र ोशीतील शेतकºयांच्या बैलगाड्यांच्या गर्दीने विश्रामगृह फुलले होते. शेतकºयांच्या मोर्चाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार भारती सागरे यांनी सामोरे यावे, अशी विनंती करण्यात आली. आढेवेढे घेणाºया तहसीलदारांना दुष्काळाचे गांभीर्य नाही असे आम्ही समजू, अशी भूमिका मोर्चाचे नेतृत्व करणारे सुभाष कुटे यांनी घेतल्यावर त्या निवेदन स्वीकारण्यासाठी आल्या. तहसीलवर निघालेला मोर्चा ही सुरु वात असून, आझाद मैदान ते मंत्रालयपर्यंत बैलगाड्यांचा असाच मोर्चा काढू व मंत्रालयाच्या दारात दुष्काळी भागातील बैल बांधू असा इशारा सुभाष कुटे यांनी दिला आहे.उपाययोजना कराव्याततालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर करपलेल्या खरिपातील पिकांचे पंचनामे व्हावेत, प्राथमिक नजर आणेवारी लवकर घोषित करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, टँकरच्या संख्येत वाढ करून तातडीने सुरू करावेत यासोबत दुष्काळसदृशतेवर दिलासादायक उपाययोजना कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी