शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

धामणगाव-टाकेद रस्त्याची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:31 IST

नांदूरवैद्य : महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी टाकेद सर्वतीर्थ ते धामणगांव हा अतिशय महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून चालतांना नागरिकांची दमछाक होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांसह भाविकांनी केली आहे.

ठळक मुद्देकाँक्रिटीकरण करण्याची नागरिकांची मागणी

नांदूरवैद्य : महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी टाकेद सर्वतीर्थ ते धामणगांव हा अतिशय महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून चालतांना नागरिकांची दमछाक होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांसह भाविकांनी केली आहे.इगतपुरी तालुक्यातील सर्वपरिचित असलेल्या तसेच रामायण काळातील घटनेतील साक्ष असलेल्या सर्वतीर्थ टाकेद ते धामणगांव या रस्त्याचे २०१४-१५ या वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळाच्या काळात रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आलेले होते. सर्वतीर्थ टाकेद या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने महाराष्ट्रातून येणारे हजारो भाविक याच रस्त्याचा वापर करत असतात.या रस्त्याने भाविकांची तसेच नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. सदर रस्ता अनेक आदिवासी गावांना जोडणारा असून दळवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कुंभमेळ्याच्या वेळी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु त्यानंतर या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरील एकही खड्डा बुजविण्याचे कष्ट संबंधित विभागाने घेतलेले नाहीत. या रस्त्याने भरवीर बुद्रुक, अडसरे खुर्द, अडसरे बुद्रुक, म्हैसवळण मार्गे राजुर अकोला, टाकेद, वासाळीकडे असंख्य नागरिक व पर्यटक भंडारदऱ्याकडे जात असतात, परंतु हा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात अडकल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथील रस्त्यावर नेहमीच खड्डे पडून या रस्त्याची दयनीय अवस्था होत असते. यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या रस्त्याचे कायमस्वरूपी मजबूत काँक्रिटीकरण करावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.सदर रस्ता हा अतिशय महत्त्वाचा व रहदारीचा असल्यामुळे या रस्त्याने अनेक कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, कंपनी कामगार, सिन्नर, नाशिक, मुंबई, इगतपुरी आदी ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने ये-जा करत असतात. तरी लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देवून या रस्त्याची दखल घेत हा रस्ता आदिवासी उपाय योजनेअंतर्गत, जिल्हा परिषदेमार्फत अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अतिशय दर्जात्मक कॉंक्रीटिकरण करण्यात यावे अशी मागणी धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे, टाकेदच्या सरपंच ताराबाई बांबळे, अडसरेचे सरपंच संतू साबळे, ज्ञानेश्वर मोंढे, मायदराचे सरपंच साहेबराव बांबळे, बाळासाहेब गाढवे, पांडुरंग गाढवे, भाऊसाहेब गाढवे, दौलत बांबळे, संतोष साबळे, संपत मोंढे, नंदू गाढवे, राजाराम गाढवे, नामदेव घुमरे, निवृत्ती जाधव, संतोष जाधव, सागर गाढवे, वसंत गाढवे, रमेश गाढवे, अशोक गाढवे आदींनी केली आहे.

सदर रस्ता सन २०१४-१५ ला कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर बनविल्यानंतर आजपर्यंत या रस्त्याची कुठलीही डागडुजी झालेली नाही. टाकेद तीर्थक्षेत्री भाविक येत असतात. हा रस्ता पर्यटन, शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी दहा ते पंधरा गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून भविष्यात हा रस्ता मजबूत करायचा असेल तर या रस्त्याचे काँक्रिटीकरणच होणे गरजेचे आहे.- समाधान वारुंगसे उपाध्यक्ष, युवासेना इगतपुरी तालुका.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाStrikeसंप