शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

उमराणे बाजार समितीत दुसर्या दिवशीही कांद्याचे लिलाव बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 9:18 PM

उमराणे : शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन पर्यंत कांदा माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुसर्या दिवशीही व्यापारी सहभागी न झाल्याने कांदा लिलाव ठप्पच होते.परिणामी भाववाढीची अपेक्षा असतानाच व्यापार्यांवर शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली असुन शासनाने योग्य तोडगा काढुन लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

ठळक मुद्देउमराणे : निर्णय न झाल्याने व्यापारी व शेतकर्यांत तिव्र नाराजी

उमराणे : शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन पर्यंत कांदा माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुसर्या दिवशीही व्यापारी सहभागी न झाल्याने कांदा लिलाव ठप्पच होते.परिणामी भाववाढीची अपेक्षा असतानाच व्यापार्यांवर शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली असुन शासनाने योग्य तोडगा काढुन लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत जवळपास सर्वच कांदा व्यापार्यांकडे शंभर ते दिडशे टन कांदा शेडमध्ये पडुन आहे. त्यामुळे तो माल निकाशी होईपर्यंत व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी होणार नसल्याची भुमिका घेतल्याने पुुढील आदेश येईपर्यंत लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.परंतु अद्यापही काही व्यापार्यांच्या माल निकाशी न झाल्याने शिवाय माल साठवणुक निर्बंध निर्णयावर तोडगा न निघाल्याने आज दुसर्या दिवशीही ( मंगळवार दि.२७ ) येथील लिलाव ठप्पच होते. परिणामी एकीकडे काही प्रमाणात शिल्लक असलेला उन्हाळी कांदा खराब होत असतानाच कांदा दरवाढ रोखण्यासाठी शासनाकडून निर्यातबंदी, कांदा आयात, प्राप्तीकर विभागाकडून चौकशी, माल साठवणुकीवर निर्बंध आदी अडचणी निर्माण करुन व्यापार्यांसह शेतकर्यांना वेठीस धरत असल्याने व्यापारी व शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली आहे.

शासनाने योग्य तो तोडगा काढुन बाजार समितीतील लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांकडुन करण्यात येत आहे. @ प्रतिक्रिया - गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे चाळीत साठवणुक केलेला कांदा पुर्णतः खराब झाल्याने सद्यस्थितीत अत्यंत कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे. व त्याची प्रतवारीही कमालीची घसरली आहे.त्यामुळे माल विक्री करणे नितांत गरजेचे असताना शासनाने माल साठवणुकीवर निर्बंध लादून व्यापार्यांबरोबर शेतकर्यांनाही वेठीस धरले आहे.

संभाजी देवरे ( शेतकरी ). @ शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने व्यापार्यांकडे आजमितीस शंकर ते दिडशे टन कांदा पडुन आहे. शिवाय जेथे माल पाठवायचा आहे तेथेही माल पडुन असल्याने मागणीत घट आली असुन कांद्याचे बाजारभाव खाली आले आहेत. त्यामुळे शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध मागे घ्यावेत किंवा किमान शंभर टनापर्यंत मर्यादा वाढवुन द्यावी.

- संजय खंडेराव देवरे ( कांदा व्यापारी )

 

 

 

 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड